शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास नेते सरसावले

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड विधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडविधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे. ते नेते आपापल्या मतदार संघाकडे रवाना झाले आहेत. प्रचारासाठी कमी दिवस हातात असल्यामुळे उमेदवारांनी इतर प्रचार साधनांबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांची यादी मिळवून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न संभाव्य उमेदवार आपापल्या मतदार संघात करत असल्याचे चित्र बीड जिल्हयात पहावयास मिळत आहे़विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक बीड जिल्हयात एकाच वेळी होत आहे़ शुक्रवारी आदर्श आचारसंहिता शुक्रवारी जाहीर झाली़ आता पर्यंत मुंबईत दबा धरून बसलेले नेते आता हळूहळू मतदार संघाकडे प्रस्थान करत असल्याचे पहावयास मिळत आहे़ प्रचारासाठी बारा-तेरा दिवस हातात असल्याने जलद प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहचू शकतो यासाठी नवनविन क्लृप्त्या राबविल्या जात आहेत़ याचाच एक भाग म्हणून काही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी बीड जिल्हयातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची यादी करून संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे काम हाती घेतलेले आहे़ बीड जिल्हयात दोन ते अडीच हजाराच्या जवळपास सामाजिक व सेवाभावी विविध संघटना आहेत़ मागील पाच वर्षात सामाजिक संघटनांकडे ढुंकुनही न पहाणारे नेते आता मतासाठी सामाजिक व सेवाभावी संघटनेच्या प्रमुखांना गोजांरत असल्याने संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे़यावेळी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुक एकत्रीत होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार होण्याची चिन्हे बीडमध्ये सध्या पहावयास मिळत आहे. असे असताना सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे वापरण्याच्या तयारीत आहेत. ज्या- ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. ते इतर वेळी मुंबईत तळ ठोकून असणारे संभाव्य उमेदवार आचारसंहिता जाहीर होताच आपापल्या मतदारसंघाकडे रवाना होताना पहावयास मिळत आहेत. प्रचारासाठी बारा ते तेरा दिवसच हातात असल्याने व ते कमी पडत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक सामाजिक संघटनांचे जाळे गावागावांमध्ये विस्तारलेले आहे. याची पुरती कल्पना धुरंधर राजकारण्यांना आहे. यामुळे कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी संघटनांची मदत घेता येऊ शकते का याची चाचपणी सुरू आहे. मात्र सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते देखील आलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना हो- हो म्हणून वाटेला लावताना दिसत आहेत. असे चित्र सध्या तरी बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.