शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना गोंजारण्यास नेते सरसावले

By admin | Updated: September 13, 2014 23:13 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड विधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडविधानसभा निवडणुकांचे बिगुल शुक्रवार पासून वाजले़ जशी आचारसंहिता लागू झाली तशी ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारीचा हिरवा कंदिल मिळाला आहे. ते नेते आपापल्या मतदार संघाकडे रवाना झाले आहेत. प्रचारासाठी कमी दिवस हातात असल्यामुळे उमेदवारांनी इतर प्रचार साधनांबरोबरच जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटनांची यादी मिळवून त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न संभाव्य उमेदवार आपापल्या मतदार संघात करत असल्याचे चित्र बीड जिल्हयात पहावयास मिळत आहे़विधानसभा व लोकसभा पोटनिवडणूक बीड जिल्हयात एकाच वेळी होत आहे़ शुक्रवारी आदर्श आचारसंहिता शुक्रवारी जाहीर झाली़ आता पर्यंत मुंबईत दबा धरून बसलेले नेते आता हळूहळू मतदार संघाकडे प्रस्थान करत असल्याचे पहावयास मिळत आहे़ प्रचारासाठी बारा-तेरा दिवस हातात असल्याने जलद प्रचाराचे वेगवेगळे फंडे वापरून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहचू शकतो यासाठी नवनविन क्लृप्त्या राबविल्या जात आहेत़ याचाच एक भाग म्हणून काही पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी बीड जिल्हयातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची यादी करून संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क करण्याचे काम हाती घेतलेले आहे़ बीड जिल्हयात दोन ते अडीच हजाराच्या जवळपास सामाजिक व सेवाभावी विविध संघटना आहेत़ मागील पाच वर्षात सामाजिक संघटनांकडे ढुंकुनही न पहाणारे नेते आता मतासाठी सामाजिक व सेवाभावी संघटनेच्या प्रमुखांना गोजांरत असल्याने संघटनांच्या कार्यकर्त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे़यावेळी विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुक एकत्रीत होत असल्याने दोन्ही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यामुळे निवडणुकीची रणधुमाळी रंगतदार होण्याची चिन्हे बीडमध्ये सध्या पहावयास मिळत आहे. असे असताना सर्वच पक्षाचे संभाव्य उमेदवार प्रचाराचे नवनवे फंडे वापरण्याच्या तयारीत आहेत. ज्या- ज्या नेत्यांना पक्ष श्रेष्ठींकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. ते इतर वेळी मुंबईत तळ ठोकून असणारे संभाव्य उमेदवार आचारसंहिता जाहीर होताच आपापल्या मतदारसंघाकडे रवाना होताना पहावयास मिळत आहेत. प्रचारासाठी बारा ते तेरा दिवसच हातात असल्याने व ते कमी पडत असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक सामाजिक संघटनांचे जाळे गावागावांमध्ये विस्तारलेले आहे. याची पुरती कल्पना धुरंधर राजकारण्यांना आहे. यामुळे कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहंचण्यासाठी संघटनांची मदत घेता येऊ शकते का याची चाचपणी सुरू आहे. मात्र सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते देखील आलेल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना हो- हो म्हणून वाटेला लावताना दिसत आहेत. असे चित्र सध्या तरी बीड जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.