शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

सर्वसामान्यांसाठी पहाड फोडणारा नेता हरपला़़़

By admin | Updated: January 24, 2017 22:36 IST

उदगीर जनसामान्यांच्या प्रश्नांना, प्रसंगी आक्रमक मार्ग स्वीकारुन तडीस लावणारा नेता... अशी चंद्रशेखर भोसले यांची ओळख होती़

व्ही.एस. कुलकर्णी उदगीरलोकांच्या मनाची नाडी ओळखून जनसामान्यांच्या प्रश्नांना, प्रसंगी आक्रमक मार्ग स्वीकारुन तडीस लावणारा नेता... अशी माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची ओळख होती़ जनतेच्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आयुधे वापरत प्रसंगी पहाड फोडणाऱ्या या नेत्याचा वाढदिवस म्हणजे एक वार्षिक उत्सव बनला होता़ राजकीय बळ नसताना स्वकर्तृत्वावर झेप घेऊन नगर परिषद ते विधान भवनापर्यंत मजल मारली. सर्वसामान्यांसाठी पहाड फोडणारा हा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविताना त्यांनी संघटनेला विधायक वळण देत विद्यापीठ पातळीवरची पदे भूषविली़ क्रीडा क्षेत्रात अधिक रस असलेल्या भोसले यांनी प्रियदर्शिनी युवक मंडळाची स्थापना करुन संस्मरणीय अशा राज्य व अखिल भारतीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा घडवून आणल्या़ भोसले यांच्या कार्याची राज्य शासनाने दखल घेऊन त्यांना शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले होते़ हे करीत असतानाच मोठे बंधू कै़ विलास भोसले यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती़ अशातच उदगीर पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याची कक्षा वाढविली़ नगर परिषदेच्या राजकारणातील त्यांची धडाडी व संघटन कौशल्य पाहून उदगीरचे तत्कालीन आमदार कै़ नारायणराव पाटील गुडसूरकर यांनी भोसले यांना नगर परिषदेत अधिक गुंतवून न ठेवता त्यांना सोबत घेऊन चंद्रशेखर भोसले हेच उदगीर मतदारसंघाचे उद्याचे नेतृत्व असल्याचे एका जाहीर सभेतून ठणकावून सांगितले होते़हा सल्ला मानून भोसले यांनी गावागावांतून कै़ विलास भोसले मित्रमंडळाच्या शाखा स्थापन केल्या़ या शाखेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी गावोगावी पशुरोग निदान शिबिरे आयोजित करुन शेतकऱ्यांचे व लोकांचे अडले नडलेले प्रश्न सोडवू लागले़ गावातल्या या शाखा म्हणजे गरजू लोकांची ही मदत केंद्रे ठरली होती़ हे कार्य चालू असतानाच प्रेरणास्थान असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांना व हाकेला ओ देण्याचे काम भोसले यांनी सातत्याने केले़ विकास नाही म्हणून ओरडत बसण्यापेक्षा विकसितांचा अभ्यास करुन त्यांच्या पाऊलवाटेवर चालण्याचा संकल्प चंद्रशेखर भोसले यांनी आमदारकीच्या प्रारंभीच व्यक्त केला होता़ त्या दृष्टीने होणारी त्यांची वाटचाल मतदारांना दिलासा देणारी ठरली होती़ जनता दल, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षात राहून काम केल्यानंतर त्यांनी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या नेतृृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता़ जनतेच्या प्रश्नासाठी पहाड फोडण्याचे प्रयत्न करणाऱ्या या नेत्याला मंगळवारी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला़