शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

महसूल वाढीच्या प्रयत्नांना तलाठ्यांनी दिला खो

By admin | Updated: June 2, 2014 01:34 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद शासनाचा महसूल वाढविण्यासाठी नगररचना विभागाने शहरालगतच्या गावांचे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे.

सुनील कच्छवे , औरंगाबाद शासनाचा महसूल वाढविण्यासाठी नगररचना विभागाने शहरालगतच्या गावांचे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी तलाठ्यांकडून आवश्यक माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, महिना उलटूनही एकाही तलाठ्याने ही माहिती दिलेली नाही. त्यामुळे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. नगररचना (मूल्यांकन) विभागाच्या वतीने दरवर्षी जमिनीचे शासकीय दर निश्चित केले जातात. सध्या जिल्ह्याचे २०१५ सालाचे बाजारमूल्य निश्चित करण्याचे काम सुरू आहे. सहायक संचालक कार्यालयातर्फे जूनअखेरीस हे मूल्य निश्चित करून त्याचा अहवाल पुणे येथील वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे. बहुतेक ग्रामीण भागात गावात सरसकट एकच दर आकारले जातात. जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना हाच दर गृहीत धरून त्यानुसार मुद्रांक व नोंदणी शुल्क आकारले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांत औरंगाबाद शहराजवळील गावांची झपाट्याने वाढ होत आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक या गावांकडे वळले असून, तेथे मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत आहेत. हे लक्षात घेऊन नगररचना विभागाने या गावांचे गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्याचे ठरविले आहे. ज्या गटांमध्ये बांधकाम प्रकल्प किंवा अकृषक परवानगी घेतली गेली त्या ठिकाणचे बाजारमूल्य वाढविण्यासाठी हे काम केले जात आहे. त्यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. गटनिहाय बाजारमूल्य निश्चित करण्यासाठी संबंधित गावांमधील जमिनीच्या प्रकाराची गटनिहाय माहितीही आवश्यक आहे. त्यासाठी सहायक संचालक कार्यालयाने महिनाभरापूर्वी तलाठ्यांना पत्र पाठवून ही माहिती मागविली. औरंगाबाद शहराजवळील ५१, खुलताबाद तालुक्यातील ५, वैजापूर तालुक्यातील ५, सिल्लोड तालुक्यातील ६, सोयगाव तालुक्यातील ४, कन्नड तालुक्यातील ५, पैठण तालुक्यातील १२ आणि गंगापूर तालुक्यातील १९ गावांची माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, महिना उलटला तरी एकाही तलाठ्याने अद्याप ही माहिती सादर केलेली नाही. या गावांची होणार गटनिहाय बाजारमूल्य निश्चिती सातारा, देवळाई, बाळापूर, गांधेली, हनुमंतगाव, सहजापूर, वडगाव कोल्हाटी, तीसगाव, पंढरपूर, वळदगाव, पाटोदा, गोलवाडी, गंगापूर नेहरी, दौलताबाद, रावरसपुरा, शेंद्रा कमंगर, सुंदरवाडी, फत्तेपूर, हिरापूर, पिसादेवी, सावंगी, झाल्टा, गेवराई, कुंभेफळ, ओहर, अंतापूर, अश्रफपूर, दौलतपूर, गोपाळपूर, जटवाडा, कृष्णापूरवाडी, मल्हारपूर, मांडकी, सुलतानपूर, तुळजापूर, कच्चीघाटी, सैजतपूर, गिरनेरा, आडगाव, बागतलाव, वरूड, गंगापूर जहांगीर, शेंद्राबन, हिवरा, टोणगाव, लाडगाव, करमाड, शरणापूर, वंजारवाडी, चौका, शेकटा.