शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
6
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
7
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
8
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
9
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
10
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
11
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
12
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
13
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
14
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
15
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
16
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
17
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
18
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
19
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
20
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र

‘अवकाळी’चा कहर सुरूचं

By admin | Updated: April 14, 2015 00:43 IST

उदगीर व देवणी तालुक्यात रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला़ दिवसा कडक उन्हं अनुभवल्यानंतर रात्री अनपेक्षितपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला

उदगीर व देवणी तालुक्यात रविवारी रात्री धो-धो पाऊस बरसला़ दिवसा कडक उन्हं अनुभवल्यानंतर रात्री अनपेक्षितपणे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला नागरिक सामोरे गेले़ पावसातील वाऱ्यामुळे अनेकांची पत्रे उडाली़ तर आनंदवाडीत वीज पडून एक म्हैैस गतप्राण झाली़ सोमवारी दुपारी पुन्हा देवणी परिसराला पावसाने झोडपले़ वलांडी भागात तर लहान आकाराच्या गाराही पडल्या़रविवारी रात्री तासभर वारे व रिमझिम कोसळल्यानंतर १० वाजण्याच्या सुमारास मात्र तुफान पाऊस सुरु झाला़ पावसात वारेही सुरु असल्याने अनेकांचे पत्रे उडाले़ दुकान, हॉटेल्ससमोरील निवारेही उडून गेले़ देवणी व परिसरात तब्बल सव्वा तासापेक्षा जास्त वेळ जोरदार पाऊस झाला़ रात्री ११़३० वाजण्याच्या सुमारास पावसाने उसंत घेतली़ या पावसामुळे नदी-नाल्यांतील डबक्यांमध्ये, रस्त्याशेजारी पाणी साचले आहे़ वलांडी : देवणी तालुक्यातील वलांडी परिसरात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला़ सोसाट्याचा वारा अन् चमकणाऱ्या विजांमुळे नागरिक भयभीत झाले होते़ रात्री सुरु झालेला पाऊस सलग तासभर पडला़ दरम्यान, सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली़ यावेळी लहान आकाराच्या गाराही बरसल्या़हाळी हंडरगुळी : मागील चार-पाच दिवसांपासून हाळी हंडरगुळी परिसरात सातत्याने वादळी वारे, विजांचा कडकडाट अन् अवकाळी पाऊस सुरु आहे़ नियमितपणे दुपारी चार वाजेनंतर वातावरणात बदल होऊन पाऊस सुरु होत आहे़ रविवारी मध्यरात्री बरसलेल्या पावसात वाऱ्यामुळे बाबा शेख, शिवशंकर गोरे यांच्यासह नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाली़ काही नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी घुसले़ निटूर : निटूर व परिसरात रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ या पावसामुळे आंब्याला लागलेल्या कैऱ्या पूर्णपणे गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला आंबा निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़ निटूर परिसरातील शेंद, मुगाव, मसलगा, ढोबळेवाडी, डांगेवाडी, उजेड, कलांडी, ताजपूर, बुजरुकवाडी, बसपूर, खडकउमरगा आदी गावांमध्ये आंब्यांची झाडे मोठ्या संख्येने आहेत़ रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे अंगद निटूरे, आत्माराम माळी, बाबुराव तत्तापूरे, पंकज कुलकर्णी आदी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे़ नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी होत आहे़ (प्रतिनिधी)