शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

स्वतंत्र राज्याच्या मागणीला लातूरकरांचा विरोध

By admin | Updated: March 24, 2016 00:49 IST

हणमंत गायकवाड , लातूर मराठवाड्यात नैसर्गिक व भौगोलिक साधन संपत्तीचा अभाव असून, दर्जेदार शिक्षणाची सोयही नाही. शिवाय, उत्पन्नाच्या स्त्रोताची साधनेही नाहीत

हणमंत गायकवाड , लातूर मराठवाड्यात नैसर्गिक व भौगोलिक साधन संपत्तीचा अभाव असून, दर्जेदार शिक्षणाची सोयही नाही. शिवाय, उत्पन्नाच्या स्त्रोताची साधनेही नाहीत. भाषावार प्रांतरचना प्रमाण माणणारा हा प्रदेश असून, त्याच्या विकासासाठी दीर्घकालीन नियोजन शासनस्तरावरून होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रादेशिक राजकारण करून विकासाच्या राजकारणाला खीळ बसविण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून होत आहे. या दिशाभूल राजकारणाला लातूरकर बळी पडणार नाहीत, असे ९५ टक्के लोकांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मत नोंदविले आहे. मराठवाड्याचा सर्वच क्षेत्रांतील अनुशेष भरलेला नाही. मराठवाड्याच्या पायाभूत सुविधांसाठी विशेष विकास पॅकेज देऊन रस्ते, रेल्वे, शिक्षण आणि जल सुविधांचे जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. याकडे लक्ष न देता स्वतंत्र राज्याची मागणी करणे किंवा समर्थन देणे म्हणजे मराठवाड्याचा अभ्यास नसण्यासारखे आहे. वास्तविक पाहता मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात विनाअट सहभागी झाला. असा मोठा विचार मराठवाड्याचा असताना स्वतंत्र राज्याची मागणी पुढे करणे म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधि आणि कौशल्य विकासाचे शिक्षण देणाऱ्या दर्जेदार शैक्षणिक संस्था मराठवाड्यात नाहीत. या संस्थांचे जाळे निर्माण करून रोजगाराभिमुख शिक्षण देण्याची गरज मराठवाड्याला आहे. कोकणात मराठवाड्यापेक्षा दहापट अधिक पाऊस पडतो. पश्चिम महाराष्ट्रात आठपट पाऊस अधिक पडतो. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. मराठवाड्यात जलसंपदा नाही, वनसंपदा नाही, भौगोलिक रचनाही नाही, अशा स्थितीत विकास साधणे गरजेचे आहे की, स्वतंत्र राज्य निर्मितीचा मुद्दा पुढे करणे गरजेचे आहे? असा सवाल उपस्थित करून लातूरच्या ९५ टक्के जनतेने राज्य निर्मितीचे समर्थन करणाऱ्या नेत्यांच्या आकलेवरच या सर्वेक्षणातून प्रहार केला आहे. केंद्रीय विद्यापीठाचा प्रस्ताव, लॉ विद्यापीठाचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत लॉ विद्यापीठ करण्याची घोषणाही केली होती, मराठवाडा नियोजन मंडळालाही अपुरा निधी दिला जातो. महाराष्ट्र जलप्राधिकरणातून मराठवाड्यासाठी काही तरतूद नाही. या बाबींवर स्वतंत्र राज्याच्या मागणीचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी लक्ष देणे किंवा अभ्यास करणे आवश्यक आहे. जनतेची दिशाभूल करून विचलित करणे योग्य नाही. स्वतंत्र राज्याच्या निर्मितीची मागणी करताना मराठवाड्याच्या उत्पन्नाचे स्त्रोत बघणेही महत्त्वाचे असल्याचे लातूरकरांनी या सर्वेक्षणातून मत व्यक्त केले आहे.