शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

हागणदारीमुक्तीत लातूर मराठवाड्यात प्रथम

By admin | Updated: July 3, 2016 00:32 IST

लातूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते़ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील

लातूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागांतर्गत स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात येते़ या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीपैकी आतापर्यंत २०४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत़ मराठवाड्यात लातूर जिल्ह्याचा हागणदारीमुक्तीमध्ये प्रथम क्रमांक आला आहे़ लातूर जिल्ह्यात प्रारंभीच्या काळात संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत २००५ ते २०१२ पर्यंत स्वच्छतेसंदर्भातील विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागात स्वच्छता जपण्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनअंतर्गत करण्यात आले़ पुढे या अभियानात बदल होऊन २०१२ ते २०१४ कालावधीत निर्मल भारत अभियान म्हणून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली़ तर २ आॅक्टोबर २०१४ पासून नरेंद्र मोदी यांनी मिशन स्वच्छ भारत ही मोहीम नव्याने कार्यान्वित केली़ या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालयाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान देऊन शौचालयाची कामे हाती घेतली़ तसेच ग्रामीण भागातील स्वच्छता जपण्यासाठी हागणदारीमुक्त चळवळ गतीमान केली़ या चळवळीत जनसामान्यांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने ग्रामीण भागात स्वच्छता अभियान कार्यक्षमपणे राबविण्यासाठी प्रभातफेऱ्या, पथनाट्य, जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले़ तसेच प्रबोधनात्मक प्रकाशित साहित्यही लोकापर्यंत वाटण्यात आले़ ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले आरोग्य चांगले रहावे यासाठी या स्वच्छतेचे महत्व ओळखून या अभियानात सहभाग घेतला़ घरोघरी शौचालय ही संकल्पना राबवून नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा ही मानसिकता ग्रामीण भागातील नागरिकांची बनविली़ त्याअंतर्गत नागरिकांनी टंचाईच्या काळातही घरोघरी शौचालये बांधली़ त्यामुळे जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतीपैकी २०४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात यश आले आहे़ परिणामी मराठवाड्याच्या तुलनेत लातूर जिल्हा आघाडीवर आहे़ नांदेड जिल्ह्यात १३०८ ग्रामपंचायतीपैकी ६० हागणदारीमुक्त झाल्या आहेत़ उस्मानाबाद ६२२ पैकी ५२, औरंगाबाद ८५६ पैकी ७५, जालना ७७६ पैकी ४०, बीड १०२० पैकी ९१, परभणी ७०४ पैकी ११६, हिंगोली ५६५ पैकी ३८ झाल्या आहेत़ हागणदारीमुक्त ग्रामपंचायती़़़४अहमदपूर ४७, औसा ३४, चाकूर २१, देवणी ११, जळकोट ११, लातूर १३, निलंगा २७, रेणापूर २३, शिरूर अनंतपाळ १२, उदगीर ५़ अहमदपूर तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीपैकी ४७ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत़ जिल्ह्यातील भविष्यात सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यासाठी मिशन स्वच्छ भारतअंतर्गत पाणी व स्वच्छता विभागांतर्गत काम सुरू आहे़