शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्रामविकासात लातूर पॅटर्न

By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे,

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.भारतीय स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, आमदार वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक, राजकीय, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रांत प्रगती करीत देशाच्या विकासात राज्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. लातूरचे भूमिपुत्र पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टी व अथक प्रयत्नाने जिल्ह्याने यशाची शिखरे गाठली आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यात पिके व पाणीसाठ्याचा प्रश्न उद्भवला आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाच्या मूलभूत हक्कांबाबत जागरुक राहून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पात्र गरजूंनी लाभ घेत राष्ट्र व राज्य निर्माणाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण, बॉम्बशोध नाशक पथक, अग्निशमन दल, आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांनी तयार केलेले चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘ पाणी साठवा, गाव वाचवा’ही योजना नुकतीच शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ३९१ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १२२ कोटी ५० लाख रुपये अर्थसहाय्यक दिले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १४५ कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ७५ कोटी ५९ लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत २ कोटी ७१ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १६ लाख ७९ हजार ७५१ नागरिकांना लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विविध विभागातील चांगल्या कामाचे कौतुक केले.