शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासात लातूर पॅटर्न

By admin | Updated: August 17, 2014 01:04 IST

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे,

लातूर : महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांत विकास साधत आघाडी घेतली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लातूर जिल्ह्याने वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.भारतीय स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुलावर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यमंत्री अमित देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, आमदार वैजनाथ शिंदे, महापौर स्मिता खानापुरे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, सामाजिक, राजकीय, साहित्य, संस्कृती अशा विविध क्षेत्रांत प्रगती करीत देशाच्या विकासात राज्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. लातूरचे भूमिपुत्र पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री आ.डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या दूरदृष्टी व अथक प्रयत्नाने जिल्ह्याने यशाची शिखरे गाठली आहेत. पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यात पिके व पाणीसाठ्याचा प्रश्न उद्भवला आहे. या टंचाईचा सामना करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मतदानाच्या मूलभूत हक्कांबाबत जागरुक राहून मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा पात्र गरजूंनी लाभ घेत राष्ट्र व राज्य निर्माणाच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांना गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कारही करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक वनीकरण, बॉम्बशोध नाशक पथक, अग्निशमन दल, आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापन आदी विभागांनी तयार केलेले चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. कार्यक्रमास स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘ पाणी साठवा, गाव वाचवा’ही योजना नुकतीच शासनाने सुरू केली आहे. या अंतर्गत भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात २ लाख ४४ हजार ३९१ गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना १२२ कोटी ५० लाख रुपये अर्थसहाय्यक दिले आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १४५ कोटी, अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत ७५ कोटी ५९ लाख आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेअंतर्गत २ कोटी ७१ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १६ लाख ७९ हजार ७५१ नागरिकांना लाभ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर विविध विभागातील चांगल्या कामाचे कौतुक केले.