शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

लता मंगेशकरांनी आंबेडकरांचे गाणे गायले नाही : रविचंद्र हडसणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 14:02 IST

‘तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसाची गाणी नका गाऊ’ वामनदादा कर्डक यांनी व्यक्त केली होती खंत

ठळक मुद्देलतादीदींना भेटण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी जेवण दिले. मात्र, गाणे काही गायले नाही.प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनीही प्रयत्न केलेविद्यापीठातील वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे व्याख्यानात प्रसिद्ध कवी डॉ. रविचंद्र हडसणकर यांची माहिती

औरंगाबाद : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील एक तरी गाणे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गावे अशी महाकवी वामनदादा कर्डक यांची आंतरिक इच्छा होती. त्यातूनच वामनदादा आणि मी लतादीदींना भेटण्यासाठी गेलो. त्यांनी जेवण दिले. मात्र, गाणे काही गायले नाही. प्रसिद्ध कवी नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनीही प्रयत्न केले, तरीही गाणे काही गायले नाही. तेव्हा वामनदादांनी ‘तुम्ही दगडांचीच गाणी गा, माणसाची गाणी नका गाऊ’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याची आठवण प्रसिद्ध कवी डॉ. रविचंद्र हडसणकर यांनी सांगितली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्रातर्फे वामनदादांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन महात्मा फुले सभागृहात मंगळवारी केले होते. प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. राहुल म्हस्के, साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे, संचालक डॉ. युवराज धबडगे उपस्थित होते. 

‘वामनदादा कर्डक : व्यक्ती आणि कार्य’ या विषयावर बोलताना डॉ. हडसणकर म्हणाले, संस्कृतीच्या ठेकेदारांनी अनेक वर्षे दीन, दलित, वंचितांचे जीवन गीत-संगीत रागदरबारातून दूरच ठेवले होते. अशा काळात वंचित समाजाचे दु:ख प्रभावीपणे मांडून वामनदादा कर्डक हे खऱ्या अर्थाने महाकवी ठरले. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक जण उभे राहिले. लेखन, गायन व लढ्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार अनेकांनी समर्थपणे पुढे नेला. हाच विचार घेऊन वामनदादांनी गीते, कविता लिहिल्या. प्रस्थापित लेखक, कलावंत मंडळी उपेक्षितांचे दु:ख मांडण्याचे टाळत होती. तेव्हा वामनदादांनी ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे’ या शब्दात वंचितांच्या जीवनात प्रकाशाची पेरणी केली. बाबासाहेबांचा लढा हा त्यांच्या गाणी, कवितांच्या माध्यमातून मांडला. त्यांनी शेती, कष्टकरी, महिला यांच्यावरील गाण्यासोबतच प्रेम, विरहाचीही गीते लिहिली. ‘सांगा या वेडीला, गुलछडीला’, ‘करिते पूजा मी गौतमाची’, ‘नदीच्या पलाड बाई झाडी लई दाट-तिथूनच जाते माझे माहेराची वाट’, अशी अनेक अजरामर गाणी लिहिली, असल्याचेही डॉ. हडसणकर यांनी सांगितले. यावेळी प्रा. राहुल म्हस्के यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते यांनी केला. संचालक डॉ. धबडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. वि.दा. मस्के यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. बाबासाहेब गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमात मोतीराज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरLata Mangeshkarलता मंगेशकरDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबाद