शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम पैसेवारी ४४ पैसे

By admin | Updated: March 17, 2015 00:41 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३५६ गावांतील रबी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती ४४ पैसे इतकी आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३५६ गावांतील रबी पिकांची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असून ती ४४ पैसे इतकी आहे. हा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. पावसाअभावी पेरणीस झालेला उशिर तर काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने रबीच्याउत्पादनामध्ये घट झाली आहे. यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे रबीच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अत्यल्प पावसामुळे स्त्रोतांच्या पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. परिणामी पाण्याअभावी रबीची पिकेही करपून गेली. त्यामुळे शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात ७३७ महसुली गावे आहेत. त्यापैकी खरीप पेरणी पिकाखालील ३६२ तर रबीच्या पिकाखाली पावणेचारशे गावे आहेत. कळंब तालुक्यातील १९ गावांची रबी पेरणी गावात खरीप पिकांचा पेरा २/३ पेक्षा जास्त असल्यामुळे पैसेवारी जाहीर करण्यात आली होती.दरम्यान, उर्वरित ३५६ गावांतील रबी पिकांची अंतिम पैसेवारी काढण्यात आलेली आहे.यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील ६९, तुळजापूर ४७, , भूम ९०, लोहारा १०, वाशी २३ आणि परंडा तालुक्यातील ९६ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आल्याचे समोर आले आहे. तसा अहवाल तहसीलदारांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी सात तालुक्यांतील ३५६ गावांची रबी पिकांची पैसेवारी ४४ पैसे इतकी जाहीर केली आहे. हा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रबी पेरणीची ३७५ गावे असून त्यापैकी कळंब तालुक्यातील १९ गावातील रबी पेरा २/३ पेक्षा जास्त पेरणी खरीप हंगामात झालेली असल्यामुळे त्या गावाची पैसेवारी खरीप हंगामात जाहीर केली असल्याने, सदर गावाची रबी हंगामाची पैसेवारी निरंक आहे. (प्रतिनिधी)