शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षबागांना अखेरची ‘घरघर’

By admin | Updated: June 12, 2014 01:36 IST

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळ असंतुलित पर्जन्यमान कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, सोबतच गारपीटीचा तडाखा यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आले

एस़आऱमुळे , शिरूर अनंतपाळअसंतुलित पर्जन्यमान कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी, सोबतच गारपीटीचा तडाखा यामुळे तालुक्यातील द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत आले असून, सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत असल्याने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील द्राक्ष बागांना अखेरची घरघर लागली आहे़ परिणामी पंचेवीस हेक्टर्सवरील द्राक्ष बागा मोडित निघाल्याचे चित्र दिसून येत आहे़ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी, साकोळ डोंगरगाव, पांढरवाडी आदी प्रकल्पांमुळे सिंचन क्षेत्र वाढले असले तरी तालुक्यातील फळबागा मात्र घटत चालल्या आहेत़ दहा वर्षापासून तालुक्यात जवळपास २५ हेक्टर्स जमिनीवर द्राक्ष बागेची लागवड करण्यात आली होती़ यात थेरगाव, लक्कडजवळगा, शेंद, कानेगाव, शिरूर अनंतपाळ, येरोळ आदी गावांचा समावेश सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे़ त्यातच त्यांना शासनाकडून फारशी मदत मिळत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत़ गत दोन-तीन वर्षापासून तालुक्यात अनावृष्टी झाल्याने मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले होते़ तर पाणी पातळी खालावल्याने विहिर, बोअर कोरडेठाक पडले होते़ तेव्हा टँकरने पाणी पुरवठा करून द्राक्ष बागा जगविण्याचा केविलवाणा प्रयत्न शिरूर अनंतपाळचे द्राक्ष बागायतदार शेतकरी गुरुनाथ सिंदाळकर यांनी केला होता़ परंतु, मार्च महिन्यात झालेल्या गारपीटीने तर त्यांची द्राक्ष बाग पूर्णत: उद्धवस्त झाली़ त्याचा पंचनामा झाला परंतु, मदत मात्र अद्यापि मिळाली नसल्याने त्यांनी दोन हेक्टर्स द्राक्ष बाग मोडून काढण्यासाठी मजुरांना गुत्ते दिले असल्याचेही सिंदाळकर यांनी सांगितले़५१ हजाराला गुत्ते़़़ द्राक्ष बागेस गारपीटीचा फटका बसल्याने द्राक्षाचे मोठे नुकसान झाले़ लागवडीचा खर्चसुद्धा पदरी पडला नसल्याने आगामी खरीप हंगामातील तरी पिके पदरी पडतील या अपेक्षेने ५१ हजार रूपयास भिवाजी चव्हाण या मजुरास गुत्ते देऊन बाग मोडीत काढण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले़ असाच काहीसा कटू अनुभव इतर गावातील शेतकऱ्यांना आला असल्यानेच एकंदर २५ हेक्टर्सवरील द्राक्ष बागा मोडित निघाल्या आहेत़केवळ एक हेक्टर शिल्लक़़़तालुक्यात सर्व प्रकारचे आघात सहन करून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता़ परंतु, मार्च महिन्यात सतत अठरा दिवस गारपीट झाली़ त्यानंतरही आजतागायत वादळी पावसाचा तडाखा सुरुच असल्याने अनेक गावातील बागा मोडित निघाल्या आता केवळ एक हेक्टर्स द्राक्ष बाग शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे़योग्य दर नाहीत़़़याबाबत येथील तालुका कृषी अधिकारी डी़बी़सुतार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नैसर्गिक आपत्ती हे तर प्रमुख कारण आहेच त्याचबरोबर महागाई मजुरांची समस्या आणि लागवडीचा खर्च वाढला़ परंतु, द्राक्षांना योग्य दर मिळत नसल्याने द्राक्ष बागा मोडित निघत आहेत़