शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

नारेगाव ग्रामस्थांची कचरा डेपोसाठी औरंगाबाद मनपास  अखेरची मुदतवाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 18:32 IST

नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर महापालिकेला आता अखेरची एक महिना मुदतवाढ दिली आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी मांडकी येथील मारुती मंदिरात घेतली.

ठळक मुद्दे कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मागील तीन महिन्यांमध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. परदेश वार्‍या आणि विविध महापालिकांनी सुरू केलेले प्रकल्प पाहण्यातच प्रशासन दंग आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी घेतली

औरंगाबाद : नारेगाव भागातील शेतकर्‍यांनी कचर्‍याच्या प्रश्नावर महापालिकेला आता अखेरची एक महिना मुदतवाढ दिली आहे. १६ फेबु्रवारीनंतर एकही ट्रक नारेगाव कचरा डेपोवर येऊ देणार नाही, अशी भूमिका रविवारी शेतकर्‍यांनी मांडकी येथील मारुती मंदिरात घेतली. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने मागील तीन महिन्यांमध्ये कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. परदेश वार्‍या आणि विविध महापालिकांनी सुरू केलेले प्रकल्प पाहण्यातच प्रशासन दंग आहे.

१९८३-८४ पासून महापालिका नारेगाव येथील गट नं. ७८, ७९ मधील ४४ एकर जागेवर कचरा टाकत आहे. मागील ३४ वर्षांमध्ये महापालिकेने कचर्‍यावर प्रक्रिया करणारा कोणताही प्रकल्प सुरू केला नाही. एक प्रकल्प सुरू केला होता, तो अल्पावधीतच बंद पडला. सध्या नारेगावात २० हजार टनांपेक्षा जास्त कचरा साचलेला आहे. कचर्‍याच्या दुर्गंधीमुळे पंचक्रोशीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. कचर्‍यामुळे चिकलठाणा विमानतळाच्या व्यवस्थापनाने विमान धावपट्टीवर उतरताना, उड्डाण घेताना पक्ष्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार केली होती. दूषित कचर्‍यामुळे नारेगाव व आसपासच्या गावांमधील पिण्याचे पाणी दूषित होत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली आहे. आठ वर्षांपूर्वी खंडपीठानेही कचरा डेपो दुसरीकडे न्यावा, असे आदेश महापालिकेला दिले आहेत. मात्र, आजपर्यंत महापालिकेने यासंदर्भात कोणतेच ठोस पाऊल उचलले नाही.

ठोस निर्णय नाहीनारेगावच्या शेतकरी आंदोलनाला तीन महिने होत आले तरी मनपाने कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. चीन दौरा, मुंबई दौरा करण्यात आला. प्रभागनिहाय कचर्‍यावर प्रक्रिया करणे, नारेगाव येथील कचरा नष्ट करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

तीन दिवस आंदोलन१३ आॅक्टोबर २०१७ रोजी कचरा डेपोच्या विरोधात अनेक गावांतील  शेतकर्‍यांनी उपोषण केले होते. याचा परिणाम म्हणून तीन दिवस महापालिकेची एकही गाडी नारेगाव कचरा डेपोवर येऊ शकली नव्हती. १५ आॅक्टोबर रोजी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मध्यस्थी करून तीन महिन्यांची मुदत मनपाला दिली. उद्या १६ जानेवारीर रोजी ही मुदत संपत आहे.

संक्रांतीच्या दिवशी निर्णयरविवारी कचरा डेपो हटाव आंदोलन समितीची एक बैठक मांडकी येथील मारुती मंदिरात घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते मनपाला आणखी एक महिन्याची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. १६ फेब्रुवारीनंतर महापालिकेची वाहने कचरा डेपोत न येऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भाऊसाहेब गायके, डॉ. विजय डक, विष्णू भेसर, राजू भेसर, रावसाहेब चौथे आदींसह पदाधिकारी हजर होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद