शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

By admin | Updated: February 6, 2017 23:04 IST

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना माघार घेण्यासाठी मंगळवारी शेवटची संधी आहे.

बीड : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांना माघार घेण्यासाठी मंगळवारी शेवटची संधी आहे. सकाळी ११ वाजता प्रक्रियेस सुरूवात होणार असून, तीन वाजेपर्यंत चालणार आहे. साडेतीननंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होणार असल्याचे निवडणूक सहायक अधिकारी छाया पवार यांनी सांगितले.जिल्ह्यातील ६० जि. प. गटामधून छानणीनंतर ५५० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते, तर १२० पं. स. साठी १७११ अर्ज दाखल आहेत. एकूण उमेदवारी अर्जापैकी माघार घेण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. प्रमुख पक्षांचे उमेदवार अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करीत असल्याचेही चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया चालणार आहे. साडेतीननंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मागील दोन दिवसांमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी लागणारा फॉर्म अपक्ष उमेदवार तसेच ज्यांना एबी फॉर्म पक्षाने दिला नाही असे अनेक जण घेऊन गेले असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)