शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गेल्या १० वर्षांपासून समाजाने वाळीत टाकलेल्या कुटुंबाची न्यायासाठी औरंगाबाद पोलीसांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:16 IST

सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देबीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे.कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. आतापर्यंत कोणाकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार त्यांनी ‘लोकमत’कडे केली आहे.

बीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,  आपण अहिर (नंदवंशी)  गवळी  असून, समाजाने मागील काही वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सामूहिक सुख-दु:खांपासून आपल्याला वाळीत टाकले आहे.  सामाजिक प्रतिष्ठेला ठेस लावणारी ही बाब असून, कुटुंबातील आई, भाऊ, बहीण, मुलांवरही या गंभीर गोष्टीचा परिणाम होत आहे. समाजाच्या या भूमिकेमुळे आमचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींवर जात पंचायत कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींना प्रोत्साहित करणार्‍या पाच इतर मंडळींची नावेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

तक्रार अर्जाची चौकशी सुरूझाडीवाले कुटुंबियांचा बेगमपुरा पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला. संबंधितांचे जाब- जबाब घेण्यात आले .  या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना रिपोर्ट करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद