शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

गेल्या १० वर्षांपासून समाजाने वाळीत टाकलेल्या कुटुंबाची न्यायासाठी औरंगाबाद पोलीसांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:16 IST

सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देबीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे.कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. आतापर्यंत कोणाकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार त्यांनी ‘लोकमत’कडे केली आहे.

बीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,  आपण अहिर (नंदवंशी)  गवळी  असून, समाजाने मागील काही वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सामूहिक सुख-दु:खांपासून आपल्याला वाळीत टाकले आहे.  सामाजिक प्रतिष्ठेला ठेस लावणारी ही बाब असून, कुटुंबातील आई, भाऊ, बहीण, मुलांवरही या गंभीर गोष्टीचा परिणाम होत आहे. समाजाच्या या भूमिकेमुळे आमचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींवर जात पंचायत कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींना प्रोत्साहित करणार्‍या पाच इतर मंडळींची नावेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

तक्रार अर्जाची चौकशी सुरूझाडीवाले कुटुंबियांचा बेगमपुरा पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला. संबंधितांचे जाब- जबाब घेण्यात आले .  या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना रिपोर्ट करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद