शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

गेल्या १० वर्षांपासून समाजाने वाळीत टाकलेल्या कुटुंबाची न्यायासाठी औरंगाबाद पोलीसांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:16 IST

सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देबीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे.कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. आतापर्यंत कोणाकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार त्यांनी ‘लोकमत’कडे केली आहे.

बीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,  आपण अहिर (नंदवंशी)  गवळी  असून, समाजाने मागील काही वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सामूहिक सुख-दु:खांपासून आपल्याला वाळीत टाकले आहे.  सामाजिक प्रतिष्ठेला ठेस लावणारी ही बाब असून, कुटुंबातील आई, भाऊ, बहीण, मुलांवरही या गंभीर गोष्टीचा परिणाम होत आहे. समाजाच्या या भूमिकेमुळे आमचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींवर जात पंचायत कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींना प्रोत्साहित करणार्‍या पाच इतर मंडळींची नावेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

तक्रार अर्जाची चौकशी सुरूझाडीवाले कुटुंबियांचा बेगमपुरा पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला. संबंधितांचे जाब- जबाब घेण्यात आले .  या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना रिपोर्ट करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद