शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या १० वर्षांपासून समाजाने वाळीत टाकलेल्या कुटुंबाची न्यायासाठी औरंगाबाद पोलीसांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:16 IST

सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देबीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे.कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे.

औरंगाबाद : सामाजिक बहिष्कार, वाळीत टाकण्याची प्रथा बंद व्हावी यासाठी अत्यंत कडक कायदे करण्यात आलेले असतानाही औरंगाबाद शहरात अहिर (नंदवंशी) समाजातील एका कुटुंबाला मागील दहा वर्षांपासून वाळीत टाकण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कोणतेच कारण नसताना समाजाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित कुटुंबाने न्याय मिळविण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. आतापर्यंत कोणाकडूनही न्याय न मिळाल्याची तक्रार त्यांनी ‘लोकमत’कडे केली आहे.

बीबी-का-मकबरा परिसरातील  राजू लालचंद झाडीवाले यांच्या कुटुंबाला २००७-०८ पासून वाळीत टाकण्यात आले आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,  आपण अहिर (नंदवंशी)  गवळी  असून, समाजाने मागील काही वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, सामूहिक सुख-दु:खांपासून आपल्याला वाळीत टाकले आहे.  सामाजिक प्रतिष्ठेला ठेस लावणारी ही बाब असून, कुटुंबातील आई, भाऊ, बहीण, मुलांवरही या गंभीर गोष्टीचा परिणाम होत आहे. समाजाच्या या भूमिकेमुळे आमचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींवर जात पंचायत कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. समाजातील सहा प्रतिष्ठित मंडळींना प्रोत्साहित करणार्‍या पाच इतर मंडळींची नावेही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.

तक्रार अर्जाची चौकशी सुरूझाडीवाले कुटुंबियांचा बेगमपुरा पोलिसांनी तक्रार अर्ज घेतला. संबंधितांचे जाब- जबाब घेण्यात आले .  या प्रकरणात वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वरिष्ठांना रिपोर्ट करण्यात येणार असल्याचे उपनिरीक्षक शेख यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद