शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

साचलेल्या कचऱ्यात दिसू लागल्या अळ्या; धोक्याची घंटा महानगरपालिकेला अजूनही ऐकू येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:56 IST

ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तीन महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासन अद्याप ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात दररोज ३५० ते ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पूर्वी हा कचरा वर्गीकरण न करता नारेगाव येथील कचरा डेपोत नेऊन टाकण्यात येत होता. १६ फेब्रुवारीपासून नारेगावचा रस्ताही मनपासाठी बंद झाला आहे. मागील तीन महिन्यांत महापालिकेला कचरा प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. ३० एप्रिल रोजी शहरातील किमान २ हजार मेट्रिक टन कचरा चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी भागात नेऊन टाकण्यात आला. त्यानंतर महापालिकेने कचराच उचलला नाही. मागील एक महिन्यापासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये कचरा पडून आहे. शहराच्या चारही भागांत कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचा देखावा मनपातर्फे करण्यात आला. प्रत्यक्षात कोणतीच प्रक्रिया मनपाने केलेली नाही. ज्या भागात कचरा टाकण्यात आला तेथे कचरा आजही सडत आहे.

महापालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करून शहरात ३५० पेक्षा अधिक कंपोस्ट पीट तयार केले. या पीटचा वापर काही प्रमाणात मनपाने केला. हा प्रयोग फसल्याचे लवकरच मनपाच्या लक्षात आले. कंपोस्ट पीटमधील कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी किमान २१ दिवस लागतात. या पीटमध्ये कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर आता मनपा पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाची या प्रकरणात चांगलीच कोंडी झाली आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद