शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

साचलेल्या कचऱ्यात दिसू लागल्या अळ्या; धोक्याची घंटा महानगरपालिकेला अजूनही ऐकू येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:56 IST

ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तीन महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासन अद्याप ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात दररोज ३५० ते ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पूर्वी हा कचरा वर्गीकरण न करता नारेगाव येथील कचरा डेपोत नेऊन टाकण्यात येत होता. १६ फेब्रुवारीपासून नारेगावचा रस्ताही मनपासाठी बंद झाला आहे. मागील तीन महिन्यांत महापालिकेला कचरा प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. ३० एप्रिल रोजी शहरातील किमान २ हजार मेट्रिक टन कचरा चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी भागात नेऊन टाकण्यात आला. त्यानंतर महापालिकेने कचराच उचलला नाही. मागील एक महिन्यापासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये कचरा पडून आहे. शहराच्या चारही भागांत कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचा देखावा मनपातर्फे करण्यात आला. प्रत्यक्षात कोणतीच प्रक्रिया मनपाने केलेली नाही. ज्या भागात कचरा टाकण्यात आला तेथे कचरा आजही सडत आहे.

महापालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करून शहरात ३५० पेक्षा अधिक कंपोस्ट पीट तयार केले. या पीटचा वापर काही प्रमाणात मनपाने केला. हा प्रयोग फसल्याचे लवकरच मनपाच्या लक्षात आले. कंपोस्ट पीटमधील कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी किमान २१ दिवस लागतात. या पीटमध्ये कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर आता मनपा पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाची या प्रकरणात चांगलीच कोंडी झाली आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद