शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

साचलेल्या कचऱ्यात दिसू लागल्या अळ्या; धोक्याची घंटा महानगरपालिकेला अजूनही ऐकू येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 15:56 IST

ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्दे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे.शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान दहा हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी कचऱ्यात अळ्या तयार होऊ लागल्या असून, जेथे कचरा साचला आहे, तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. तीन महिन्यांपासून कचराकोंडी सुरू आहे. त्यानंतरही महापालिका प्रशासन अद्याप ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. शहरात लवकरच साथरोग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात दररोज ३५० ते ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. पूर्वी हा कचरा वर्गीकरण न करता नारेगाव येथील कचरा डेपोत नेऊन टाकण्यात येत होता. १६ फेब्रुवारीपासून नारेगावचा रस्ताही मनपासाठी बंद झाला आहे. मागील तीन महिन्यांत महापालिकेला कचरा प्रश्नाचे उत्तर सापडलेले नाही. ३० एप्रिल रोजी शहरातील किमान २ हजार मेट्रिक टन कचरा चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी भागात नेऊन टाकण्यात आला. त्यानंतर महापालिकेने कचराच उचलला नाही. मागील एक महिन्यापासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये कचरा पडून आहे. शहराच्या चारही भागांत कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचा देखावा मनपातर्फे करण्यात आला. प्रत्यक्षात कोणतीच प्रक्रिया मनपाने केलेली नाही. ज्या भागात कचरा टाकण्यात आला तेथे कचरा आजही सडत आहे.

महापालिकेने तब्बल ५ कोटी रुपये खर्च करून शहरात ३५० पेक्षा अधिक कंपोस्ट पीट तयार केले. या पीटचा वापर काही प्रमाणात मनपाने केला. हा प्रयोग फसल्याचे लवकरच मनपाच्या लक्षात आले. कंपोस्ट पीटमधील कचऱ्यावर प्रक्रिया होण्यासाठी किमान २१ दिवस लागतात. या पीटमध्ये कचऱ्यावर प्रक्रियाच होत नसल्याचे निदर्शनास आल्यावर आता मनपा पदाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रशासनाची या प्रकरणात चांगलीच कोंडी झाली आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद