शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 15:44 IST

जिल्ह्यात सध्या १,०३२ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देसोमवारी ८४ नवे रुग्ण, ३ रुग्णांचा मृत्यू, १०४ कोरोनामुक्त

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल ७१ दिवसांनंतर सोमवारी रुग्णसंख्येत मोठी घट झाली आणि दुहेरी संख्येत रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात ८४ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या १०४ रुग्णांना सुटी देण्यात आली, तसेच जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी ६४ रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर प्रत्येक दिवशी तिहेरी आकड्यात कोरोनाचे रुग्ण आढळत होते. अनेकदा ही संख्या चारशेच्या जवळ गेली होती. जिल्ह्यात सध्या १,०३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३७,५६५ झाली आहे. जिल्ह्यात  एकूण रुग्णांपैकी ३५,४७४ रुग्ण बरे झाले आहेत, तर एकूण १,०५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ८४ रुग्णांत ग्रामीण भागातील १६,  मनपा हद्दीतील २६ आणि अन्य ४२ रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन टेस्टद्वारे  मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाला ४२ आणि ग्रामीण भागात ८ रुग्ण आढळले. मनपा हद्दीतील २२ आणि ग्रामीण भागातील ८२, अशा १०४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना एन-९ येथील ६७ वर्षीय स्त्री, पडेगावातील ८० वर्षीय स्त्री आणि सिल्क मिल कॉलनीतील ६१ वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला.

ग्रामीण भागातील रुग्णसिद्धनाथ वडगाव १, गंगापूर ४, शहापूर, गंगापूर २, लासूर १, देवपूळ, कन्नड १, फुलंब्री १, कन्नड २, पैठण १, सिल्लोड ३.

मनपा हद्दीतील रुग्णबायजीपुरा १, मुकुंदवाडी १, काल्डा कॉर्नर १, वेदांतनगर १, मिटमिटा १, एन-१ सिडको १, देवळाई परिसर, सातारा १, शिवाजीनगर १, सह्याद्री हिल्स १, केशवनगरी १, प्रोझोन मॉलजवळ १, पडेगाव २, घाटी परिसर २, चेतनानगर १, नक्षत्रवाडी २, सावंगी, हर्सूल १, चिकलठाणा १, बन्सीलालनगर १, मिलिट्री हॉस्पिटल १, जहांगीर कॉलनी १, मुकुंदवाडी २, जवाहर कॉलनी १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद