शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
7
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
8
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
9
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
10
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
11
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
12
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
13
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
14
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
15
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
16
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
17
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
18
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
19
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
20
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"

संमती नसताना शासनाने घेतल्या ताब्यात जमिनी

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्‍यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे.

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्‍यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, निम्न दुधना प्रकल्पातील कालव्यातील जाणार्‍या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे द्यावा यासाठी २००९ पासून माकप व किसान सभेचे कॉ.रामेश्वर पौळ, लिंबाजी कचरे, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, धोंडीराम पौळ, लक्ष्मणराव मुळे, माणिक मुळे, हिंमतराव बारहाते, ज्ञानेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे. प्रशासनाने वेळोवेळी दबावतंत्राचा वापर करुन काही शेतकर्‍यांना केवळ ४८ हजार रुपये प्रति एकर मावेजा देऊन संमत्या घेतल्या. परंतु, बर्‍याच शेतकर्‍यांनी आजपर्यंत संमती दिली नाही व मावेजाही घेतला नाही. या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या समवेत अनेकवेळा बैठका झाल्या. केंद्र शासनाच्या २०१३ च्या भूमी अधिग्रहणाचा नवीन कायदा जानेवारी २०१४ पासून लागू झाला. या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या तीनपट रक्कम शेतकर्‍यांना जमिनीची किंमत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार मार्च २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या शेतकर्‍यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली नाही अथवा मावेजा घेतला नाही, अशा शेतकर्‍यांना नवीन कायदा लागू करा, असा आदेश असताना निम्न दुधना प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना नवीन कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. याउलट ८ मे २०१४ रोजी रात्री डिग्रस व इरळद या परिसरात १४४ कलम लावून शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या दडपशाहीच्या जोरावर अधिकार्‍यांनी काम सुरु करुन शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. याप्रकरणी संमती नसताना जमिनी ताब्यात घेणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, जमिनीची किंमत अत्यल्प दिली जात आहे. त्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. आज या जमिनीचा बाजारभाव एकरी १५ लाख रुपयांपेक्षा जास्त असताना सरकार केवळ ४८ हजार रुपये प्रतिएकर देऊन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार बाजारभावाच्या तीनपट जमिनीला मोबदला द्यावा, परिसरात लागू केलेले १४४ कलम रद्द करावे आदी मागण्या माकप व किसान सभेने केल्या आहेत.