शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

जमीन, कामगार, पाणी इथले; ‘सीएसआर’ दुसरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 17:59 IST

उद्योगांनी कॉर्पोरेट सोशल रिपॉन्सिबिलिटी फंड स्थानिक ठिकाणी दिल्यास विकास होईल

ठळक मुद्देसीएमआयएने निमंत्रित केल्यामुळे धक्काच बसला.मी मुस्लिम नव्हे तर औरंगाबादचा खासदार आहे.येथे निमंत्रित केल्यामुळे आनंदच होतो आहे.

औरंगाबाद : उद्योग, जमीन, कामगार, पाणी, वीज येथील वापरतात आणि कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत देण्यात येणारी मदत दुसरीकडे देतात. सीएसआरचा निधी येथेच दिला तर या शहरातील पर्यटन, ऐतिहासिक दरवाजांसह इतर विकासाची कामे वेगाने होतील. उद्योगांनी सीएसआर येथेच द्यावा, असे आवाहन खा.इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी केले. 

सीएमआयएतर्फे खा.जलील यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष गिरीधर संगनेरिया, सचिव शिवप्रसाद जाजू, कमलेश धूत, माजी अध्यक्ष राम भोगले, गुरूप्रीतसिंग बग्गा, मुकुंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. 

खा.जलील म्हणाले, सीएमआयएने निमंत्रित केल्यामुळे धक्काच बसला. मी मुस्लिम नव्हे तर औरंगाबादचा खासदार आहे. येथे निमंत्रित केल्यामुळे आनंदच होतो आहे. उद्योग, पर्यटन, दळणवळणासाठी चांगले काम करण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागेल. शहराची प्रतिमा संवेदनशील आहे. ती प्रतिमा आपल्याला सर्वांना मिळून बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. औरंगाबादच्या विकासासाठी पर्यटन महत्त्वाचे आहे. कुठे न कुठे काही चुका आहेत. त्या सुधाराव्या लागतील.उदयपूर, हैदराबाद विमानसेवेचा फायदा निश्चित होईल. तसेच इतर विमानसेवेसाठीदेखील आपले प्रयत्न सुरूच राहतील. या संदर्भात थेट केंद्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सव घ्यावे लागतील. दुष्काळासारखी कारणे अधिकाऱ्यांनी पुढे करून महोत्सव घेणे बंद करू नये. पुण्यात काही झाले तरी महोत्सव घेतला जातो. या संवाद कार्यक्रमात व्यापारी महासंघ, उद्योजकांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संगनेरिया यांनी केले. सचिव जाजू यांनी खा.जलील यांचा परिचय करून दिला. तर माजी अध्यक्ष भोगले यांनी अध्यक्षीय समारोपात उद्योगांसमोरील आव्हाने विशद केली. 

कदम आणि खैरे यांच्यातील फरक सांगितलाखा.जलील यांनी माजी खा.चंद्रकांत खैरे आणि माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्या कार्यशैलीचा एक किस्सा यावेळी सांगितला. ऐतिहासिक दरवाजांच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसीमध्ये मुद्दा मांडला असता माजी खा.खैरे म्हणाले, केंद्राकडे १०० कोटींचा निधी मागितला आहे. यावर मग कदम यांना बोललो. त्यांनी तातडीने एका दरवाजाच्या संवर्धनासाठी डीपीडीसीतून ३ कोटी दिले. कदम यांचा कटकटगेट परिसरात जंगी सत्कार केला. तो सत्कार पाहून कदम म्हणाले, असा सत्कार मी आजवर पाहिला नाही. मग मी म्हणालो, पाणचक्कीच्या संवर्धनासाठी निधी द्या, यापेक्षा मोठा सत्कार करतो. अशी काही उदाहरणे खा.जलील यांनी संवादाप्रसंगी दिली.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलCMIA Aurangabadसीएमआयए औरंगाबादtourismपर्यटनbusinessव्यवसायfundsनिधी