शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

जमीन, कामगार, पाणी इथले; ‘सीएसआर’ दुसरीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 17:59 IST

उद्योगांनी कॉर्पोरेट सोशल रिपॉन्सिबिलिटी फंड स्थानिक ठिकाणी दिल्यास विकास होईल

ठळक मुद्देसीएमआयएने निमंत्रित केल्यामुळे धक्काच बसला.मी मुस्लिम नव्हे तर औरंगाबादचा खासदार आहे.येथे निमंत्रित केल्यामुळे आनंदच होतो आहे.

औरंगाबाद : उद्योग, जमीन, कामगार, पाणी, वीज येथील वापरतात आणि कॉर्पाेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत देण्यात येणारी मदत दुसरीकडे देतात. सीएसआरचा निधी येथेच दिला तर या शहरातील पर्यटन, ऐतिहासिक दरवाजांसह इतर विकासाची कामे वेगाने होतील. उद्योगांनी सीएसआर येथेच द्यावा, असे आवाहन खा.इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी केले. 

सीएमआयएतर्फे खा.जलील यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष गिरीधर संगनेरिया, सचिव शिवप्रसाद जाजू, कमलेश धूत, माजी अध्यक्ष राम भोगले, गुरूप्रीतसिंग बग्गा, मुकुंद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. 

खा.जलील म्हणाले, सीएमआयएने निमंत्रित केल्यामुळे धक्काच बसला. मी मुस्लिम नव्हे तर औरंगाबादचा खासदार आहे. येथे निमंत्रित केल्यामुळे आनंदच होतो आहे. उद्योग, पर्यटन, दळणवळणासाठी चांगले काम करण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागेल. शहराची प्रतिमा संवेदनशील आहे. ती प्रतिमा आपल्याला सर्वांना मिळून बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. औरंगाबादच्या विकासासाठी पर्यटन महत्त्वाचे आहे. कुठे न कुठे काही चुका आहेत. त्या सुधाराव्या लागतील.उदयपूर, हैदराबाद विमानसेवेचा फायदा निश्चित होईल. तसेच इतर विमानसेवेसाठीदेखील आपले प्रयत्न सुरूच राहतील. या संदर्भात थेट केंद्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सव घ्यावे लागतील. दुष्काळासारखी कारणे अधिकाऱ्यांनी पुढे करून महोत्सव घेणे बंद करू नये. पुण्यात काही झाले तरी महोत्सव घेतला जातो. या संवाद कार्यक्रमात व्यापारी महासंघ, उद्योजकांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संगनेरिया यांनी केले. सचिव जाजू यांनी खा.जलील यांचा परिचय करून दिला. तर माजी अध्यक्ष भोगले यांनी अध्यक्षीय समारोपात उद्योगांसमोरील आव्हाने विशद केली. 

कदम आणि खैरे यांच्यातील फरक सांगितलाखा.जलील यांनी माजी खा.चंद्रकांत खैरे आणि माजी पालकमंत्री रामदास कदम यांच्या कार्यशैलीचा एक किस्सा यावेळी सांगितला. ऐतिहासिक दरवाजांच्या दुरुस्तीसाठी डीपीडीसीमध्ये मुद्दा मांडला असता माजी खा.खैरे म्हणाले, केंद्राकडे १०० कोटींचा निधी मागितला आहे. यावर मग कदम यांना बोललो. त्यांनी तातडीने एका दरवाजाच्या संवर्धनासाठी डीपीडीसीतून ३ कोटी दिले. कदम यांचा कटकटगेट परिसरात जंगी सत्कार केला. तो सत्कार पाहून कदम म्हणाले, असा सत्कार मी आजवर पाहिला नाही. मग मी म्हणालो, पाणचक्कीच्या संवर्धनासाठी निधी द्या, यापेक्षा मोठा सत्कार करतो. अशी काही उदाहरणे खा.जलील यांनी संवादाप्रसंगी दिली.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलCMIA Aurangabadसीएमआयए औरंगाबादtourismपर्यटनbusinessव्यवसायfundsनिधी