शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

भूसंपादन अधिसूचनेस स्थगिती

By admin | Updated: May 28, 2014 01:15 IST

औरंगाबाद : भूसंपादन नुकसानभरपाई देण्याबाबत काढलेल्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील जमिनीचे भूसंपादन करताना बाजारभावाच्या फक्त एक पट एवढी नुकसानभरपाई देण्याबाबत महाराष्टÑ शासनाने काढलेल्या दि. १९ मार्च २०१४ च्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. थोडक्यात हकीकत अशी : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावाकरिता दोनशे हेक्टर जमीन भूसंपादन करण्याकरिता भूसंपादन अधिनियम १९८४ च्या कलम ४ अ नुसार अधिसूचना पाठवली व कलम ९ खाली ६ आॅगस्ट २०१२ रोजी नोटिसा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील जमिनीचे अधिग्रहण करताना बाजारभावाच्या एक ते दोन पट किंमत द्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. बाजारभाव एक ते दोन पट ठरवताना ग्रामीण व शहरी भाग व प्रकल्पापासून प्रत्यक्ष अंतर हा निकष नमूद केला आहे; मात्र महाराष्टÑ शासनाने दि. १९ मार्च २०१४ च्या अधिसूचनेद्वारे ग्रामीण भागातील सर्व जमिनीचा बाजारभाव एक पटच असेल, असे जाहीर केले. शासनाने कल्याणकारी कायद्याचा सोयीचा; परंतु चुकीचा अर्थ काढून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांवर अन्यायकारक निर्णय लादला व कायद्याचे कलम २६ व परिशिष्ट १ निष्प्रभ केले, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. याचिकाकर्ते पंजाबराव बोराडे यांच्यातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर, अ‍ॅड. उमाकांत आवटे व अ‍ॅड. दीपक काकडे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अधिग्रहित जमिनीची नुकसानभरपाई करताना बाजारभावाच्या एक ते दोन पट किंमत वाढवून देण्याची कायद्यातील तरतूद व त्यानुसार शासनास देण्यात आलेले कायदेशीर अधिकार बदलता येणार नाहीत. संसदेने पारित केलेल्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार महाराष्टÑ शासनाला नाही. सदरील अधिसूचनेमुळे भारतीय राज्यघटनेतील कलम १४ खालील समता व समान हक्क या मूलभूत तत्त्वाचा, घटनेतील कलम ३०० (अ) मधील मालमत्ता व मालमत्ता अधिकाराचा भंग होतो. म्हणून ही अधिसूचना घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावी. कारण ही अधिसूचना २०१३ च्या कायद्याच्या कलम २६, परिशिष्ट-१ शी सुसंगत नाही. या अधिसूचनेमुळे महाराष्टÑातील लाखो शेतकर्‍यांना कायमस्वरूपी नुकसान सोसावे लागले असते. असेही अ‍ॅड. तळेकर यांनी म्हटले. ग्रामीण भागातील जमिनीचे अधिग्रहण करताना बाजारभावाच्या एक ते दोन पट किंमत द्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. बाजारभाव एक ते दोन पट ठरवताना ग्रामीण व शहरी भाग व प्रकल्पापासून प्रत्यक्ष अंतर हा निकष नमूद केला आहे.