शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

जिल्ह्यातील ४४ गावांत भूसंपादन...!

By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद सोलापूर- धुळे या ४५३ कि. मी. राष्ट्रीय महामार्गातील फक्त औरंगाबाद ते कन्नड दरम्यान ८० कि. मी. च्या रस्त्यासाठी भूसंपादन रखडले आहे.

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबादसोलापूर- धुळे या ४५३ कि. मी. राष्ट्रीय महामार्गातील फक्त औरंगाबाद ते कन्नड दरम्यान ८० कि. मी. च्या रस्त्यासाठी भूसंपादन रखडले आहे. या महामार्गात येणाऱ्या ४४ गावांची ५१३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. भूसंपादन न झाल्याने मागील अडीच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला असून, या प्रकल्पाची किंमत दररोज २ कोटीने वाढत आहे. यासाठी आता खुद्द ‘नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ (एनएचएआय) ने स्वत:च भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. औरंगाबाद शहराच्या दक्षिण बाजूस बीड बायपासला समांतर औरंगाबाद बायपास तयार करण्यात येणार आहे. येथून २११ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. निपाणीपासून महामार्गाला सुरुवात होईल व कन्नड तालुक्यातील तेलवाडीपर्यंत महामार्ग असणार आहे. तेथून पुढे भांबरवाडीपासून चाळीसगाव घाटातून ७ कि. मी. चा बोगदा तयार करण्यात येणार आहे.भूसंपादनाअभावी महामार्गाचे काम खोळंबलेकेंद्र सरकारने सोलापूर- धुळे या राष्ट्रीय महामार्गाला परवानगी देऊन त्यासाठी ३४०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापैकी सोलापूर ते औरंगाबाद हा रस्ता सुमारे २९० किलोमीटरचा आहे. त्यापैकी सोलापूर ते येडशी या १०० कि. मी. रस्त्याचे काम यापूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. आता येडशी ते औरंगाबाद या १९० कि. मी. च्या रस्त्याचे भूसंपादन झाले असून, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे कंत्राट ‘आयआरबी इन्फ्रा’ या कंपनीने घेतले आहे. कंपनीला हे काम पूर्ण करण्यासाठी अडीच वर्षांची मुदत दिली आहे. तसेच चाळीसगाव ते धुळे या ८३ कि. मी. महामार्गाच्या भूसंपादनाचे कामही पूर्ण झाले आहे. आता फक्त औरंगाबाद ते कन्नड या ८० कि. मी. च्या रस्त्यासाठी महामार्गाचे काम खोळंबले आहे. या गावांचे होणार भूसंपादनऔरंगाबाद - निपाणी, आडगाव (बु.), झाल्टा, गांधेली, बागतलाव, बाळापूर, देवळाई, सातारा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, वळदगाव, पंढरपूर, तीसगाव, साजापूर, करोडी, माळीवाडा, केसापुरी तांडा, रामपुरी. गंगापूर - आसेगाव, तळेसमान, फतियाबाद, जांभाळा, वरझडी, पाचपीरवाडी, दिवसी.खुलताबाद - मलकापूर, कसाबखेडा, मंबापूर, तल्याचीवाडी, वेरूळ, पळसवाडी, गल्लेबोरगाव, खासपूर.कन्नड - अलापूर, टापरगाव, हतनूर, बनशेंद्रा, विठ्ठलपूर, कन्नड, रेलनवाडी, मक्रणपूर, अंधानेर, लंगडा तांडा, तेलवाडी. ३४०० कोटींचा प्रकल्पराष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातील ४४ गावांतून जाणार आहे. यासाठी ५१३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून, यात औरंगाबादेतील १८ गावे, गंगापूर तालुक्यातील ७ गावे, खुलताबाद तालुक्यातील ८ तर कन्नड तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातून ८० कि. मी. चा महामार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे २ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच चाळीसगाव (आट्रम घाट) तून ७ कि. मी. चा बोगदा तयार करण्यासाठी १४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जोपर्यंत ८० टक्के भूसंपादन होत नाही, तोपर्यंत केंद्र सरकार पुढील प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देणार नाही. जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया रखडल्याने सोलापूर- धुळे या ३४०० कोटींच्या प्रकल्पाची किंमत दररोज २ कोटीने वाढत आहे. प्रकल्पाचे काम ५ वर्षांत पूर्ण करण्यासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येण्यासाठी खुद्द एनएचएआय आता तयारीला लागली आहे. महिना १ लाखाचा खर्च भूसंपादन प्रक्रियेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी एनएचएआयने दोन कर्मचारी, संगणक व इंडिगो कार दिली आहे. दोन कर्मचाऱ्यांमध्ये एक निवृत्त तहसीलदार व निवृत्त नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर महिन्याला एनएचएआय १ लाख रुपयांचा खर्च करीत आहे. मात्र, मागील अडीच वर्षांत भूसंपादनाचा कागदही येथून पुढे सरकला नाही. तीन ठिकाणी होणार बायपासराष्ट्रीय महामार्गात औरंगाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी बायपास करण्यात येणार आहे. यात शहराच्या दक्षिण बाजूस औरंगाबाद बायपास. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव बायपास व कन्नड, अंधानेर येथून बायपास तयार करण्यात येणार आहे. भूसंपादन झाल्यावर तीन दिवसांत रक्कम मिळणारराष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक जे. यू. चामरगोरे यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गाचे काम ५ वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भूसंपादनासाठीची रक्कमही केंद्र सरकारने दिली आहे. जेव्हा जिल्ह्यातील चार तालुक्यातील ४४ गावांमधील ५१३ हेक्टर जमीन संपादित करण्यात येईल, त्याच्या तीन दिवसांनंतर लगेच संपूर्ण रक्कम जमीन मालकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. एवढी तयारी प्राधिकरणाने केली आहे. भूसंपादन लवकर होण्यासाठी आता प्राधिकरणाने तयारी सुरूकेली आहे.