शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

अंत्यविधीसाठीही लागेनात दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:10 IST

सातारा- देवळाई भागात राहणा-या नागरिकांचा आनंद दोन वर्षांपूर्वी गगनात मावत नव्हता. निमित्त होते, शासनाने या भागाचा मनपा हद्दीत समावेश केल्याचा; पण मागील दीड - दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी येथे आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा- देवळाई भागात राहणा-या नागरिकांचा आनंद दोन वर्षांपूर्वी गगनात मावत नव्हता. निमित्त होते, शासनाने या भागाचा मनपा हद्दीत समावेश केल्याचा; पण मागील दीड - दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी येथे आला.सातारा येथील रहिवासी अश्विनी देशमुख यांचे गुरुवारी निधन झाले. नातेवाईकांनी रात्री उशिरा अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. रात्री ९.३० वाजता अंत्यसंस्कार करायचे तर कसे, असा प्रश्न नातेवाईक आणि गावकºयांना पडला. सातारा-देवळाई भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेह न्यायचा कसा, स्मशानभूमीतील अंधारात अंत्यसंस्कार कसे करणार, असे एक नव्हे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. संकटात धावून येण्याची प्रवृत्ती असलेल्या गावकºयांनी तब्बल ४०० फूट वायर टाकून स्मशानभूमीपर्यंत लाईट, फोकस लावण्याची व्यवस्था केली. त्यामुळे अंत्यविधी व्यवस्थित पार पडला. मागील महिन्यात एका लहान मुलीचा सातारा कब्रस्तानात दफनविधी करतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागला. या भागात राहणाºया नागरिकांना रात्री अंत्यविधी करायचा म्हटले, की अक्षरश: धडकीच भरते. कारण स्मशानभूमीत कोणत्याच मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. यासंदर्भात नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून पथदिवे लावा, स्मशानभूमीत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या यासाठी प्रशासनाकडे पन्नास वेळेस पत्रव्यवहार केला. पथदिव्यांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर अधिकाºयांकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.महापालिकेतील अधिकाºयांनी ठरविले, तर त्यांच्या सोयीची कामे अवघ्या काही मिनिटांमध्ये होतात. त्यासाठी टेंडर, आयुक्तांची मंजुरी, स्थायी-सर्वसाधारण सभेची मंजुरीही लागत नाही. ‘६७-३-सी’ या आणीबाणीच्या कायद्याचा आधार घेत पाणीपुरवठा विभागाने ७ कोटींची कामे केली. लाखो रुपये खर्च करून पदाधिकाºयांची दालने चकाचक होतात. ज्यांना अधिकार नाहीत, त्या अधिकाºयांना क्षणार्धात विमान प्रवासाची मुभा आणि खर्चापोटी अ‍ॅडव्हान्स मिळतो. स्मशानभूमीत चार दिवे लावण्यासाठी प्रशासनाला निविदा प्रक्रिया करावी लागते; यापेक्षा सर्वसामान्यांचे दुर्दैव आणखी काय असावे!२०० लाईट फिटिंग तयारमनपाने सिडको बसस्थानक ते जळगाव रोडवर नवीन २०० लाईट बसविले. जुने २०० लाईट पडून आहेत. हे लाईट सातारा-देवळाईत लावा, असे आदेश महापौरांनी दिले होते. पंधरा दिवस उलटले तरी अधिकाºयांनी एकही पथदिवा साताºयात लावला नाही. फक्त पोल उभे करून लाईट लावणे एवढेही काम मनपाकडून होत नाही.