शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अंत्यविधीसाठीही लागेनात दिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:10 IST

सातारा- देवळाई भागात राहणा-या नागरिकांचा आनंद दोन वर्षांपूर्वी गगनात मावत नव्हता. निमित्त होते, शासनाने या भागाचा मनपा हद्दीत समावेश केल्याचा; पण मागील दीड - दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी येथे आला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा- देवळाई भागात राहणा-या नागरिकांचा आनंद दोन वर्षांपूर्वी गगनात मावत नव्हता. निमित्त होते, शासनाने या भागाचा मनपा हद्दीत समावेश केल्याचा; पण मागील दीड - दोन वर्षांपासून या भागातील नागरिकांना दररोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. याचा प्रत्यय गुरुवारी येथे आला.सातारा येथील रहिवासी अश्विनी देशमुख यांचे गुरुवारी निधन झाले. नातेवाईकांनी रात्री उशिरा अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला. रात्री ९.३० वाजता अंत्यसंस्कार करायचे तर कसे, असा प्रश्न नातेवाईक आणि गावकºयांना पडला. सातारा-देवळाई भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मृतदेह न्यायचा कसा, स्मशानभूमीतील अंधारात अंत्यसंस्कार कसे करणार, असे एक नव्हे असंख्य प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. संकटात धावून येण्याची प्रवृत्ती असलेल्या गावकºयांनी तब्बल ४०० फूट वायर टाकून स्मशानभूमीपर्यंत लाईट, फोकस लावण्याची व्यवस्था केली. त्यामुळे अंत्यविधी व्यवस्थित पार पडला. मागील महिन्यात एका लहान मुलीचा सातारा कब्रस्तानात दफनविधी करतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागला. या भागात राहणाºया नागरिकांना रात्री अंत्यविधी करायचा म्हटले, की अक्षरश: धडकीच भरते. कारण स्मशानभूमीत कोणत्याच मूलभूत सोयी-सुविधा नाहीत. यासंदर्भात नगरसेविका सायली जमादार यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून पथदिवे लावा, स्मशानभूमीत मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या यासाठी प्रशासनाकडे पन्नास वेळेस पत्रव्यवहार केला. पथदिव्यांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर अधिकाºयांकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.महापालिकेतील अधिकाºयांनी ठरविले, तर त्यांच्या सोयीची कामे अवघ्या काही मिनिटांमध्ये होतात. त्यासाठी टेंडर, आयुक्तांची मंजुरी, स्थायी-सर्वसाधारण सभेची मंजुरीही लागत नाही. ‘६७-३-सी’ या आणीबाणीच्या कायद्याचा आधार घेत पाणीपुरवठा विभागाने ७ कोटींची कामे केली. लाखो रुपये खर्च करून पदाधिकाºयांची दालने चकाचक होतात. ज्यांना अधिकार नाहीत, त्या अधिकाºयांना क्षणार्धात विमान प्रवासाची मुभा आणि खर्चापोटी अ‍ॅडव्हान्स मिळतो. स्मशानभूमीत चार दिवे लावण्यासाठी प्रशासनाला निविदा प्रक्रिया करावी लागते; यापेक्षा सर्वसामान्यांचे दुर्दैव आणखी काय असावे!२०० लाईट फिटिंग तयारमनपाने सिडको बसस्थानक ते जळगाव रोडवर नवीन २०० लाईट बसविले. जुने २०० लाईट पडून आहेत. हे लाईट सातारा-देवळाईत लावा, असे आदेश महापौरांनी दिले होते. पंधरा दिवस उलटले तरी अधिकाºयांनी एकही पथदिवा साताºयात लावला नाही. फक्त पोल उभे करून लाईट लावणे एवढेही काम मनपाकडून होत नाही.