शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सात कुटुंबांना लाखाची मदत

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली : मागील काही दिवसांत जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास २५ ते ३0 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

हिंगोली : मागील काही दिवसांत जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. वर्षभरात जवळपास २५ ते ३0 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या महिन्यात शेतकरी आत्महत्या समितीसमोर मदतीसाठी आलेल्या प्रस्तावांपैकी ७ मंजूर झाले असून त्यांच्या कुटुंबियांना लाखाची मदत मिळणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली.जिल्ह्यातील एकूण ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्याबाबत कुटुंबियांना मदतीसाठी प्रस्ताव तहसील प्रशासनाकडून सादर करण्यात आले होते. जिल्हास्तरीय समितीने केलेल्या तपासणीअंती त्यातील ७ प्रस्ताव मदतीसाठी पात्र ठरले आहेत. यात औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी सावळी येथील डिगांबर किशन सांगळे, माथा येथील उमराव मारोतराव कुटे, अनखळी वाडी येथील संपत मारोतराव चाटे, पार्डी सावळी येथील सोपान किशनराव सांगळे, कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील विठ्ठल जगदेवराव माने, सेनगाव तालुक्यातील खुडज येथील नवनाथ विश्वनाथ घोशिर, वसमत तालुक्यातील दारेफळ येथील माणिक उमाजी भालेराव या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. नापिकी व कर्जाच्या तगाद्याला कंटाळून या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना लाखाची मदत दिली जाणार आहे. यासाठी सात लाखांची मदत जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित तहसीलला धनादेशाद्वारे पाठविण्यात आली आहे. ३0 हजारांची थेट मदत व ७0 हजार रुपये पोस्टाद्वारे टप्प्या-टप्प्याने दिले जातात. आणखी दोन आत्महत्याग्रस्तांचे प्रस्ताव समितीसमोर चर्चेला आले होते. मात्र त्यातील एक अपात्र ठरले तर दुसरे फेरतपासणीसाठी ठेवण्यात आले आहे.(वार्ताहर)