शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
4
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
5
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
6
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
7
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
8
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
9
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
10
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
11
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
12
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
13
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
14
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
15
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
16
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
17
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
18
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
19
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM

कृषी विभागाकडून जनजागृतीचा अभाव

By admin | Updated: August 6, 2015 00:08 IST

बीड: प्रशासनाकडून शेती औजारांपासून बी-बियाणांपर्यंतच्या योजना राबविल्या जात आहे. मात्र तालुका स्तरावरून योजनांविषयी जनजागृती होत

बीड: प्रशासनाकडून शेती औजारांपासून बी-बियाणांपर्यंतच्या योजना राबविल्या जात आहे. मात्र तालुका स्तरावरून योजनांविषयी जनजागृती होत नसल्याने सर्वसामान्य शेतकरी यापासून वंचित राहत आहे. जिल्हा कृषि कार्यालयाकडून आलेले टार्गेट केवळ कागदोपत्रीच पुर्ण करण्यावर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून भर दिला जात आहे. दरवर्षी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये बदल केला जातो. बदलल्या योजना, अनुदानाची टक्केवारी, विविध जाती प्रवर्गासाठी असलेले अनुदान शेतकऱ्यांना माहिती व्हावे यासाठी माहिती पुस्तिकाही प्रकाशित करण्यात येते. यंदाही जिल्हा कृषि विभागाकडून सर्व तालुका कृषि अधिकाऱ्यांना या माहिती पुस्तिकेचे सर्कल प्रमाणे वाटप करण्यात आले. मात्र स्थानिक पातळीवर या सर्व पुस्तिका कार्यालयात धुळखात पडून असल्याचे दिसून येत आहे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देणे अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री योजना राबवून अधिकारी, कर्मचारी सेफ राहण्यातच स्वायरस्य मानत आहे. योजनांची माहिती व्हावी याकरिता कृषी दिनाचे औचित्य साधून कृषि सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुका कृषि अधिकाऱ्यांसह, कृषि सहाय्यक यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती विषयी मार्गदर्शन करून योजनांविषयी माहिती देणे बंधनकारक होते. एक प्रोसेस म्हणून काही निवडक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याशी संपर्क साधला मात्र कृषि सप्ताहाचा उद्देश बाजूलाच राहिला. योजनांची माहिती व प्रत्येक शेतकरी कृषि विभागाशी जोडण्याच्या हेतू या सप्ताहामागे होता. याकरिता शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक, शेती क्षेत्र, पिक लागवड पद्धती याची नोंद घेणे बंधनकारक होते. मात्र या किचकड पद्धतीला सर्रास अधिकाऱ्यांनी बगल दिली आहे. प्रशासनाकडून हजारो योजना शेतकऱ्यांसाठी असल्या तरी कृषि विभाग व शेतकत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने लाभार्थी हे वंचितच राहत आहे. काही मोजकेच शेतकरी अधिकारांना हाताशी धरून योजना पदरात पाडून घेत आहेत. कृषि कार्यालयातून योजनांची माहितीही अधिकारी देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)योजना पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषि कार्यालय, तलाठी कार्यालय, बँका आदी ठिकाणचे उंबरठे झिजवावे लागत असत. केंद्र सरकारच्या नव्या प्रणालीनुसार शकतरी हीतांच्या योजनांचे अनुदान प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्यामुळे वेळेचा अपव्यय टळणार असून मध्यस्तींना बाजूला सारून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, असे कृषी तंत्रज्ञ अधिकारी एस. बी. देशमुख यांनी सांगितले.