शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

राज्यात पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव

By | Updated: November 28, 2020 04:07 IST

औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ...

औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उसासाठी पाण्याचा बेसुमार उपसा व उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी आगामी काळात राज्यात पाणीबाणी अटळ आहे, असे प्रतिपादन स्टॉकहोम वॉटर पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने ‘वातावरणातील बदल व जल व्यवस्थापन’ या विषयावर गुरुवारी वेबिनार झाला. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्र कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ होते.

राजेंद्र सिंह म्हणाले, राज्यात पाणी मुलबक असताना त्याचे योग्य ते नियोजन होत नाही. दुसरीकडे जिरायती शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यासाठी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे, जिरलेले पाणी योग्यरितीने वापरले पाहिजे, तरच हा समतोल साधला जाईल. ‘ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज’ हा या शतकातील कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले,

निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्यात शेती - सहकार या क्षेत्राची उभारणी व शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यात पोहचविण्याचे काम सहकारमहर्षि बाळासाहेब पवार यांनी केले. एकप्रकारे ग्रामीण मराठवाडा समृध्द व संपन्न करण्यात बाळासाहेब पवारांचे योगदान अतुलनीय आहे. अध्यक्षीय समारोप डॉ. श्याम शिरसाठ यांनी केला. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

चौकट....

कार्यक्रमास मान्यवरांनी लावली हजेरी

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, उद्योजक मानसिंग पवार, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांच्यासह १४० संशोधक, प्राध्यापक, अभ्यासकांचा सहभाग होता.