शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

राज्यात पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव

By | Updated: November 28, 2020 04:07 IST

औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ...

औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उसासाठी पाण्याचा बेसुमार उपसा व उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी आगामी काळात राज्यात पाणीबाणी अटळ आहे, असे प्रतिपादन स्टॉकहोम वॉटर पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने ‘वातावरणातील बदल व जल व्यवस्थापन’ या विषयावर गुरुवारी वेबिनार झाला. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्र कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ होते.

राजेंद्र सिंह म्हणाले, राज्यात पाणी मुलबक असताना त्याचे योग्य ते नियोजन होत नाही. दुसरीकडे जिरायती शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यासाठी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे, जिरलेले पाणी योग्यरितीने वापरले पाहिजे, तरच हा समतोल साधला जाईल. ‘ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज’ हा या शतकातील कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले,

निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्यात शेती - सहकार या क्षेत्राची उभारणी व शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यात पोहचविण्याचे काम सहकारमहर्षि बाळासाहेब पवार यांनी केले. एकप्रकारे ग्रामीण मराठवाडा समृध्द व संपन्न करण्यात बाळासाहेब पवारांचे योगदान अतुलनीय आहे. अध्यक्षीय समारोप डॉ. श्याम शिरसाठ यांनी केला. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

चौकट....

कार्यक्रमास मान्यवरांनी लावली हजेरी

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, उद्योजक मानसिंग पवार, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांच्यासह १४० संशोधक, प्राध्यापक, अभ्यासकांचा सहभाग होता.