शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव

By | Updated: November 28, 2020 04:07 IST

औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ...

औरंगाबाद : शेती व सहकाराच्या माध्यमातून एकेकाळी महाराष्ट्र हा आर्थिक संपन्न म्हणून ओळखला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उसासाठी पाण्याचा बेसुमार उपसा व उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजनाअभावी आगामी काळात राज्यात पाणीबाणी अटळ आहे, असे प्रतिपादन स्टॉकहोम वॉटर पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार अध्यासन केंद्राच्या वतीने ‘वातावरणातील बदल व जल व्यवस्थापन’ या विषयावर गुरुवारी वेबिनार झाला. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी या विषयावर मार्गदर्शन केले. सहकारमहर्षी बाळासाहेब पवार यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्र कुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ होते.

राजेंद्र सिंह म्हणाले, राज्यात पाणी मुलबक असताना त्याचे योग्य ते नियोजन होत नाही. दुसरीकडे जिरायती शेतीचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. यासाठी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जिरवला पाहिजे, जिरलेले पाणी योग्यरितीने वापरले पाहिजे, तरच हा समतोल साधला जाईल. ‘ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज’ हा या शतकातील कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले,

निजामाच्या जोखडातून मुक्त झालेल्या मराठवाड्यात शेती - सहकार या क्षेत्राची उभारणी व शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यात पोहचविण्याचे काम सहकारमहर्षि बाळासाहेब पवार यांनी केले. एकप्रकारे ग्रामीण मराठवाडा समृध्द व संपन्न करण्यात बाळासाहेब पवारांचे योगदान अतुलनीय आहे. अध्यक्षीय समारोप डॉ. श्याम शिरसाठ यांनी केला. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी आभार मानले.

चौकट....

कार्यक्रमास मान्यवरांनी लावली हजेरी

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, उद्योजक मानसिंग पवार, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे आदींची उपस्थिती होती. अधिसभा सदस्य डॉ. राम चव्हाण, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांच्यासह १४० संशोधक, प्राध्यापक, अभ्यासकांचा सहभाग होता.