शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

सुविधांअभावी लाखोंचे नुकसान

By admin | Updated: July 27, 2015 01:12 IST

बीड : औद्योगिक वसाहत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उद्योगांना रस्ता, पाणी, नाला, पथदिवे या सुविधा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे

बीड : औद्योगिक वसाहत महामंडळाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील उद्योगांना रस्ता, पाणी, नाला, पथदिवे या सुविधा मिळत मिळत नाहीत. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागत असून उद्योजकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्ह्यात बीड, पाटोदा, धारूर आणि आष्टी येथे औद्योगिक वसाहती आहेत. परंतु कोणत्याच औद्योगिक वसाहतीत उद्योगांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड उद्योजकांमधून ऐकावयास मिळत आहे.अचानक वीज गेली तर..२० मिनीटासाठी बत्ती गुल झाली तर याचा विपरीत परिणाम उद्योगांवर होतो. आॅईल मिलधारकांना सर्व कच्चा माल काढून तिला साफ करावे लागते. यासाठी सुमारे चार ते पाच तास वेळ लागत असून २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. रिमोल्डींग फॅक्टरीबाबतही असेच आहे. मशीनमधील रबर खराब होते. नव्याने ती प्रक्रिया सुरू करावी लागते. तसेच आईस फॅक्टरीमध्ये बर्फ वितळल्याने मोठे नुकसान होते. बीडमध्ये विविध असे शंभरावर उद्योग सुरू आहेत. अचानक वीज गायब झाल्याने संतापलेले उद्योजक अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात आणि वाद निर्माण होतो.नाल्या नसल्याने साचले डबकेएमआयडीसी भागात कारखान्यातील घाण पाणी बाहेर जाण्यासाठी नाल्या नाहीत. त्यामुळे कारखान्यासमोर पाण्याचे डबके साचले असून दुर्गंधी पसरत आहे. कामगारांना व परिसरातील लोकांना याचा त्रास होतो.दोन विहिरीतून पाणीपुरवठासध्या बीड एमआयडीसीतील उद्योगांना दोन विहिरींतून पाणीपुरवठा सुरू आहे. दररोज १०० घनमीटर पाण्याची गरज उद्योगांना आहे तर नगरपालिकेचे येणारे पाणी साठवून तेच पाणी उद्योगांना पुरविले जात असल्याचे प्रभारी उपविगायीय अभियंता परळीकर म्हणाले.(प्रतिनिधी)