शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

वेगळ्या विदर्भासाठी समर्थ नेतृत्वाचा अभाव

By admin | Updated: January 11, 2016 00:07 IST

औरंगाबाद : विदर्भाकडे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व होते. तरीदेखील विदर्भाचा विकास झाला नाही. राजकीय सत्ता एखाद्या प्रदेशाकडे असली म्हणजे

औरंगाबाद : विदर्भाकडे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व होते. तरीदेखील विदर्भाचा विकास झाला नाही. राजकीय सत्ता एखाद्या प्रदेशाकडे असली म्हणजे त्याचा विकास होतोच असे नाही. मध्यवर्ती सत्तेत दुबळेपणा असला की स्वतंत्र राज्याची मागणी रेटली जाते. स्वतंत्र राज्याची मागणी करीत असतानासुद्धा विदर्भाला समर्थ नेतृत्व मिळाले नाही, असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उदारकला (लिबरल आर्टस्) विभाग आणि अमेरिकेतील ‘महाराष्ट्र स्टडीज ग्रुपतर्फे आयोजित ‘महाराष्ट्र : प्लेस अँड स्पेस’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत रविवारी ते बोलत होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जयंत लेले होते. यावेळी प्रा. सुहास पळशीकर, संयोजक डॉ. वि. ल. धारूरकर, समन्वयक डॉ. बीना सेंगर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. सुहास पळशीकर यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई, विदर्भ विभागाचे स्थान’ या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंधाचे सादरीकरण करताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाचासुद्धा विषय चर्चेला आला. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर पुन्हा वेगळ्या विदर्भाचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, विदर्भ वेगळे झाले, तरी त्याचा महाराष्ट्राच्या एकूण सर्वच परिस्थितीवर फारसा परिणाम होईल, असे वाटत नाही. विदर्भाचे नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांना केवळ विदर्भाचेच पाठबळ आहे असेही नाही. त्यांना उर्वरित महाराष्ट्रातूनदेखील चांगले पाठबळ आहे. मुंबई आणि विदर्भ हे दोन्ही विषय भाषिक केलेले आहेत. मुंबईचे राजकारण भाषिक अस्मितेभोवती फिरविले जाते.सायंकाळी या तीन दिवसीय परिषदेचा समारोप झाला. समारोप सत्रामध्ये ज्येष्ठ नाट्यकलावंत डॉ. मोहन आगाशे, आॅस्ट्रेलियाचे प्रा. जयंत लेले, अमेरिकेतील अ‍ॅरिझोन विद्यापीठाच्या प्रा. एन. एनसील, रशियातील मॉस्को विद्यापीठाच्या डॉ. एरिना रिस्कोवा, पतियाळा येथील वीरेंद्रपाल सिंग आदींची उपस्थिती होती. परिषदेचे संयोजक डॉ. वि. ल. धारूरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी नाट्यशास्त्र विभागातील प्रा. अशोक बंडगर लिखित ‘देवदासी’ एकांकिकेचे सादरीकरण करण्यात आले. डॉ. मोहन आगाशे यासंबंधी म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी पोषक अशी ही एकांकिका आहे. एकांकिकेच्या माध्यमातून प्रभावी संदेश देण्यात आला आहे, या शब्दात त्यांनी एकांकिकेची प्रशंसा केली. उपस्थितांचे आभार डॉ. बीना सेंगर यांनी मानले.