शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भराडीच्या बाजारात पशुधनाची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:14 IST

हजारावर जनावरे आली विक्रीसाठी : दुष्काळ, पाणी -चारा टंचाईने बळीराजा हवालदिल

प्रमोद शेजूळभराडी : सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. भराडी येथील जनावरांच्या आठवडी बाजारात एक हजारावर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व जनावरे घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री झाली.७० ते ८० हजारांची बैलजोडी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केवळ ४० ते ५० हजारात विकली.तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पशुधन विक्रीस काढले आहे. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहेत. मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र आता प्रमाण वाढले आहे.काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाºयाचे भाव आकाशाला भिडले आहेत. ५०० ते ७०० रूपयाला मिळणारा कडबा आता २ ते ३ हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करणे, वाहतूक खर्च हे सर्वसामान्य शेतकºयाला परवडणारे नाही. पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकºयांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भराडी परिसरात मजुरांना काम नाही. रोजगार हमीची कामे अजून सुरु झाली नाही. कामाच्या शोधात मजूर परजिल्ह्यात जात आहेत. खरीप तर गेला रबीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.चौकट...पशुपालकांच्या डोळ्यात अश्रूपोटच्या लेकरासारखा जीव लावलेले पशुधन बेभाव विकताना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येत होते. जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा, विकावे तर भाव नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. विक्रीसाठी आलेली गुरांची वाढती संख्या दुष्काळाचे विदारक चित्र सांगत आहे.कोट......मुलासारखी जपलेली बैलजोडीदुष्काळी परिस्थितीमुळे इच्छा नसतानाही मुलासारखी जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.- नाना जिजा शेजूळ, शेतकरी, रा. उपळी.व्यापारी झाले कसाईमाझ्याकडे चारा नाही. आगामी ६ महिने जनावरांचे पोट कसे भरावे, याची चिंता असल्याने ७० हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापाºयांनी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली. बाजारात जनावरे जास्त आल्याने व्यापारी कसाई झाले आहेत. त्यांनी कमी भावात जनावरे मागितली. नाइलाजाने ती विकावी लागली.- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ, रा मांडगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार