शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

भराडीच्या बाजारात पशुधनाची बेभाव विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:14 IST

हजारावर जनावरे आली विक्रीसाठी : दुष्काळ, पाणी -चारा टंचाईने बळीराजा हवालदिल

प्रमोद शेजूळभराडी : सिल्लोड तालुक्यात भीषण दुष्काळ, पाणी व चारा टंचाईने बळीराजा हवालदिल झाला आहे. भराडी येथील जनावरांच्या आठवडी बाजारात एक हजारावर जनावरे विक्रीसाठी आली होती. जनावरे जास्त व जनावरे घेणारे व्यापारी कमी आल्याने कवडीमोल भावात जनावरांची विक्री झाली.७० ते ८० हजारांची बैलजोडी हताश झालेल्या शेतकऱ्यांनी केवळ ४० ते ५० हजारात विकली.तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांनी पशुधन विक्रीस काढले आहे. बाजारात पशुधन विक्रीचे प्रमाण वाढल्याने भाव दुपटीने घसरले आहेत. मागील महिन्यात जनावरे बाजारात येण्याचे प्रमाण कमी होते, मात्र आता प्रमाण वाढले आहे.काही शेतकरी चारा शोधण्यासाठी धावपळ करीत आहे. मात्र चाºयाचे भाव आकाशाला भिडले आहेत. ५०० ते ७०० रूपयाला मिळणारा कडबा आता २ ते ३ हजारात मिळत आहे. शिवाय कुट्टी करणे, वाहतूक खर्च हे सर्वसामान्य शेतकºयाला परवडणारे नाही. पाणी नसल्याने मकाची वाढ झाली नाही. यामुळे चारा कमी निघाला आहे. परजिल्ह्यात चारा मागणी वाढल्याने भाव वाढले आहेत. परजिल्ह्यात जाणारा चारा रोखला गेला तर किमान तालुक्यात शेतकºयांना चारा मिळेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.भराडी परिसरात मजुरांना काम नाही. रोजगार हमीची कामे अजून सुरु झाली नाही. कामाच्या शोधात मजूर परजिल्ह्यात जात आहेत. खरीप तर गेला रबीही नाही. तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाईने उग्ररूप धारण केले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर असला तरी प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना अद्यापही सुरू झाल्या नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.चौकट...पशुपालकांच्या डोळ्यात अश्रूपोटच्या लेकरासारखा जीव लावलेले पशुधन बेभाव विकताना बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येत होते. जनावरांचा उदरनिर्वाह कसा करावा, विकावे तर भाव नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. विक्रीसाठी आलेली गुरांची वाढती संख्या दुष्काळाचे विदारक चित्र सांगत आहे.कोट......मुलासारखी जपलेली बैलजोडीदुष्काळी परिस्थितीमुळे इच्छा नसतानाही मुलासारखी जपलेली बैलजोडी कवडीमोल भावाने विक्री करावी लागली.- नाना जिजा शेजूळ, शेतकरी, रा. उपळी.व्यापारी झाले कसाईमाझ्याकडे चारा नाही. आगामी ६ महिने जनावरांचे पोट कसे भरावे, याची चिंता असल्याने ७० हजार रुपयांच्या बैलजोडीची व्यापाºयांनी केवळ चाळीस हजार रुपयांत बोली लावली. बाजारात जनावरे जास्त आल्याने व्यापारी कसाई झाले आहेत. त्यांनी कमी भावात जनावरे मागितली. नाइलाजाने ती विकावी लागली.- सोमनाथ रामभाऊ गुंजाळ, रा मांडगाव

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार