शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान

By admin | Updated: April 13, 2015 00:48 IST

लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत

लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.बुधवारपासून गेली चार दिवस लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. निलंगा, औसा, देवणी, लातूर, चाकूर तालुक्यांत पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. किल्लारी परिसरात द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतामध्ये उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकालाही फटका बसला आहे. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. सततचा दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती असतानाही किल्लारी परिसरातील बागायतदारांनी द्राक्षबागा जोपासल्या. प्रसंगी शेतामध्ये विंधन विहिरी घेतल्या. शेततळी निर्माण केली. परंतु, अवकाळीने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे संचालक राजेंद्र गुंडाप्पा बिराजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. किल्लारी परिसर द्राक्ष बागांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. येथील द्राक्ष इंग्लंड, आफ्रिका, युरोपीयन देशांत निर्यात होतात. गेल्या काही वर्षांपासून पाण्याचे संकट निर्माण झाल्यामुळे ५० टक्के बागा मोडीत काढल्या आहेत. उर्वरित ५० टक्के बागांमधील द्राक्षांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशी माहिती विश्वजित निळकंठ पाटील यांनी दिली. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या कैऱ्या झडल्या असून, फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे विजय माधव भोसले यांनी सांगितले. कलमी आंबे, डाळिंब, द्राक्षांचेही मोठे नुकसान झाल्याचे मत सिरसलचे माधव धानुरे, विनायक कुमठे, सीताराम जाधव, अनिल चेळकर यांनी व्यक्त केले. चाकूर व चापोली परिसरातही फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदपूर व जळकोट तालुक्यातही वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)