शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान

By admin | Updated: April 13, 2015 00:48 IST

लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत

लातूर : अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे झडले असून, द्राक्ष व केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.बुधवारपासून गेली चार दिवस लातूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. निलंगा, औसा, देवणी, लातूर, चाकूर तालुक्यांत पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. किल्लारी परिसरात द्राक्ष, डाळिंब, केळीच्या बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेतामध्ये उभ्या असलेल्या ज्वारीच्या पिकालाही फटका बसला आहे. महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. सततचा दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती असतानाही किल्लारी परिसरातील बागायतदारांनी द्राक्षबागा जोपासल्या. प्रसंगी शेतामध्ये विंधन विहिरी घेतल्या. शेततळी निर्माण केली. परंतु, अवकाळीने त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे संचालक राजेंद्र गुंडाप्पा बिराजदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. किल्लारी परिसर द्राक्ष बागांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. येथील द्राक्ष इंग्लंड, आफ्रिका, युरोपीयन देशांत निर्यात होतात. गेल्या काही वर्षांपासून पाण्याचे संकट निर्माण झाल्यामुळे ५० टक्के बागा मोडीत काढल्या आहेत. उर्वरित ५० टक्के बागांमधील द्राक्षांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, अशी माहिती विश्वजित निळकंठ पाटील यांनी दिली. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या कैऱ्या झडल्या असून, फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे विजय माधव भोसले यांनी सांगितले. कलमी आंबे, डाळिंब, द्राक्षांचेही मोठे नुकसान झाल्याचे मत सिरसलचे माधव धानुरे, विनायक कुमठे, सीताराम जाधव, अनिल चेळकर यांनी व्यक्त केले. चाकूर व चापोली परिसरातही फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदपूर व जळकोट तालुक्यातही वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)