शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पालिका-नागरिकांत समन्वयाचा अभाव !

By admin | Updated: January 18, 2015 00:32 IST

बीड : नगरपालिका व नागरिकांमध्ये समन्वयच नाही. त्यामुळे सुविधा सोयीस्कर होण्याऐवजी अडचणीच्या ठरत आहेत.

बीड : नगरपालिका व नागरिकांमध्ये समन्वयच नाही. त्यामुळे सुविधा सोयीस्कर होण्याऐवजी अडचणीच्या ठरत आहेत. केरकचरा, पाणी यासाठी पालिकेने योग्य नियोजन केले पाहिजे शिवाय नागरिकांनीही जबाबदाऱ्या ओळखायला हव्यात. पालिका व नागरिकांत समन्वय असेल तरच शहराचा गाडा व्यवस्थित चालू शकतो, असा निष्कर्ष ‘लोकमत’च्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या परिसंवादात निघाला. अवैध नळजोडण्या घेणाऱ्यांनी वैध करुन घ्याव्यात. स्वत:हून नळजोडण्या घेण्यासाठी पुढे यावे़ पाणीपुरवठा पाच दिवसांवरुन दोन दिवसावर आणण्याचा प्रयोग यापूर्वी केला होता;पण त्यामुळे अधिकच पाणी वाया जाऊ लागले. त्यामुळे हा प्रयोग थांबवावा लागला़- एम़ एस़ वाघ, पाणीपुरवठा अभियंता‘मुलभुत गरजा व समस्या’ या विषयावर आधारित परिसंवादात नगरसेवक अमृत सारडा, पालिकेचे स्वच्छता निरीक्षक युवराज कदम, पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ, अ‍ॅड. करुणा टाकसाळ, सामाजिक कार्यकर्ते ललित आब्बड, अमर नाईकवाडे, पंकज कुटे, डॉ. अनिल बारकूल यांचा सहभाग होता. ‘लोकमत’ने शहरातील पाणीटंचाई व कचरा हे दोन विषय ‘फोकस’ केले होते. त्यानुषंगाने झालेल्या परिसंवादात व्यवस्थापनापासून ते नागरिकांच्या जबाबदाऱ्या व करावयाचे उपाय यावर मनमोकळी चर्चा झाली. अधिकारी म्हणाले, नागरिकांचे सहकार्य नाही. अवैध नळजोडण्या आहेत. कारवाया करायला गेल्यावर लोेक तलवारी घेऊन अंगावर धावून येतात. नगरसेवक म्हणाले, मनुष्यबळ वाढवून सेवा सुरळीत करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेला जबाबदार धरले. कचरा उचलून नेत नाहीत. पाणी पाच दिवसाला दोन तास सोडण्याऐवजी एक दिवसाआड एकच तास सोडावे. वकील, डॉक्टरांनीही पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन नागरिकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाशझोत टाकला.तोट्या नाहीत, वसुलीही कमीपाणीपुरवठा विभागाचे अभियंता एम. एस. वाघ यांनी सांगितले,बीड शहराला २५ एमएलडी पाण्याचीगरज आहे. प्रत्यक्षात २८ एमएलडी पाणी सोडले जाते. तीन एमएलडी पाणी लिकेज व इतर कारणांमुळे वाया जाते. एका कुटुंबाला ६७५ लिटर पाणी देणे आवश्यक आहे;पण त्यापेक्षा जास्त पाणी दिले जाते. कुठे जादा दाबाने पाणी जाते तर कुठे कमी. मात्र, प्रत्येकवेळी पालिकेला दोष देणे उचित नाही. कारण अनेकदा वीज सुरळीत नसते. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होतो. पालिकेकडून लिकेज दुरुस्ती केली जाते. काही ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून लिकेज आहे तसेच ठेवले जातात. फक्त पाणी वाया जाऊ नये म्हणून तोट्या बसविलेल्या आहेत. काळी जण नळाला विद्युतपंप बसवितात. गरजेपुरतेचे पाणी घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.पालिकेकडे नाही नियोजन सामाजिक कार्यकर्ते पंकज कुटे यांनी पालिकेच्या कुचकामी यंत्रणेवर बोट ठेवले. कचरा वेळेवर उचलत नाहीत, घंटागाड्या उशिरा येतात. सकाळी सहा ते आठ या वेळेत महिला साफसफाई करुन कचरा फेकून देतात. काहीवेळा घंटागाड्या सकाळी दहानंतर येतात. तोपर्यंत काही महिला कामावर निघून जातात. घंटागाडी येऊनही उपयोग नाही. (प्रतिनिधी)