शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्यांना घरघर

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली.

लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली. पण त्यावेळी बंधाऱ्याचे झालेले निकृष्ट काम, गायब झालेले गेट, दुरुस्तीसाठी निधी नसलेला निधी त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याला घरघर लागली असून, निर्मितीचा उद्देशही पाण्यात गेल्याचे दिसत आहे़लोहारा शहराच्या शिवारात ६, जेवळी ११, धानुरी, आष्टाकासार, तोरंबा, कास्ती (खुर्द) व अचलेर या गावात प्रत्येकी २ तर सास्तूर, माकणी, तावशीगड, हिप्परगा (रवा), कानेगाव, सालेगाव शिवारात प्रत्येकी १ असे एकूण तालुक्यात ३३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. यातील २८ बंधाऱ्याची कामे जि.प. कडून करण्यात आली आहेत. ३३ बंधाऱ्यासाठी १०५९ गेट बसविण्यात होती़ यामधील २६१ गेट गायब असल्याची तक्रार सरकारी दप्तरात आहे. पण प्रत्यक्षात मात्र जास्त गेट गायब आहेत. त्यात जेवळी परिसरात गेट चोरुन नेताना शेतकऱ्यांनीच एका चोरट्याला पकडल्याची घटना आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने गेले अनेक वर्षांपासून एक रुपयाची तरतूद केलेली नाही. त्यामुळे संबंधित विभाग मात्र त्या-त्या गावातील ग्रा.पं. व शेतकऱ्यांच्या सहभागातून असलेली गेट बसविले जातात.या ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे परिसरातील २९०१.२३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होवून त्यातून ९६६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणे अपेक्षित होते. पण लाखो रुपये खर्च होवून बंधारे बांधण्याचा उद्देश मात्र सफल झाल्याचे दिसून येत नाही. यावर्षी ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यापैकी पाच बंधाऱ्यासाठी गेट उपलब्ध झाले. पण गेट बसवणे हे लोकसभागातूनच होणार आहे. शासन विविध योजनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करते. पण प्रत्यक्षात मात्र ज्याचा उपयोग शेतीसाठी होतो. त्यावर खर्च करण्यास मात्र कुचराईपणा केला जातो. यावरुनच हे स्पष्ट होते. (वार्ताहर)बंधाऱ्याची दुरूस्ती गरजेचीशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ मात्र, अनेक बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही़ त्यामुळे नादुरूस्त बंधारे दुरूस्त करून गेट बसवणे गरजेचे आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल़ शिवाय आर्थिक उत्पन्नतही भर पडेल, असे शेतकरी सूर्यकांत बिराजदार यांनी सांगितले.लोकसहभागावर भरकोल्हापुरी बंधाऱ्यासाठी गत अनेक वर्षापासून निधीची मागणी करीत आहोत़ पण निधी मिळत नाही. यावर्षी ३३ पैकी पाच बंधाऱ्याला नवीन गेट आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्ही याहीवर्षी लोकसहभागातून सर्वच बंधाऱ्यावर गेट बसणार आहेत, असे लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई.टी. सूर्यवंशी यांनी सांगितले.शेतकऱ्यांनीच निगराणी ठेवावीकोल्हापुरी बंधारे हे शासनाची मालमत्ता नसून ती आपलीच मालमत्ता आहे, असे समजून परिसरातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची निगराणी केली पाहिजे. जेणे करुन गेट चोरीचे प्रमाण कमी होईल व गेट बसविल्यानंतर याचा फायदा आपल्याला होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. असे सास्तूर येथील शेतकरी किसन पवार यांनी सांगितले.