शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कोल्हापुरी बंधाऱ्यांना घरघर

By admin | Updated: June 10, 2014 00:55 IST

लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली.

लोहारा : सिंचन क्षमता वाढावी या उद्देशाने लोहारा तालुक्यातील १३ गावामध्ये ३३ कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आली. पण त्यावेळी बंधाऱ्याचे झालेले निकृष्ट काम, गायब झालेले गेट, दुरुस्तीसाठी निधी नसलेला निधी त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्याला घरघर लागली असून, निर्मितीचा उद्देशही पाण्यात गेल्याचे दिसत आहे़लोहारा शहराच्या शिवारात ६, जेवळी ११, धानुरी, आष्टाकासार, तोरंबा, कास्ती (खुर्द) व अचलेर या गावात प्रत्येकी २ तर सास्तूर, माकणी, तावशीगड, हिप्परगा (रवा), कानेगाव, सालेगाव शिवारात प्रत्येकी १ असे एकूण तालुक्यात ३३ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. यातील २८ बंधाऱ्याची कामे जि.प. कडून करण्यात आली आहेत. ३३ बंधाऱ्यासाठी १०५९ गेट बसविण्यात होती़ यामधील २६१ गेट गायब असल्याची तक्रार सरकारी दप्तरात आहे. पण प्रत्यक्षात मात्र जास्त गेट गायब आहेत. त्यात जेवळी परिसरात गेट चोरुन नेताना शेतकऱ्यांनीच एका चोरट्याला पकडल्याची घटना आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने गेले अनेक वर्षांपासून एक रुपयाची तरतूद केलेली नाही. त्यामुळे संबंधित विभाग मात्र त्या-त्या गावातील ग्रा.पं. व शेतकऱ्यांच्या सहभागातून असलेली गेट बसविले जातात.या ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे परिसरातील २९०१.२३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध होवून त्यातून ९६६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणे अपेक्षित होते. पण लाखो रुपये खर्च होवून बंधारे बांधण्याचा उद्देश मात्र सफल झाल्याचे दिसून येत नाही. यावर्षी ३३ कोल्हापुरी बंधाऱ्यापैकी पाच बंधाऱ्यासाठी गेट उपलब्ध झाले. पण गेट बसवणे हे लोकसभागातूनच होणार आहे. शासन विविध योजनाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करते. पण प्रत्यक्षात मात्र ज्याचा उपयोग शेतीसाठी होतो. त्यावर खर्च करण्यास मात्र कुचराईपणा केला जातो. यावरुनच हे स्पष्ट होते. (वार्ताहर)बंधाऱ्याची दुरूस्ती गरजेचीशेतकऱ्यांच्या फायद्यासाठी कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत़ मात्र, अनेक बंधाऱ्यांची दुरवस्था झाली असून, शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही़ त्यामुळे नादुरूस्त बंधारे दुरूस्त करून गेट बसवणे गरजेचे आहे़ त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल़ शिवाय आर्थिक उत्पन्नतही भर पडेल, असे शेतकरी सूर्यकांत बिराजदार यांनी सांगितले.लोकसहभागावर भरकोल्हापुरी बंधाऱ्यासाठी गत अनेक वर्षापासून निधीची मागणी करीत आहोत़ पण निधी मिळत नाही. यावर्षी ३३ पैकी पाच बंधाऱ्याला नवीन गेट आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आम्ही याहीवर्षी लोकसहभागातून सर्वच बंधाऱ्यावर गेट बसणार आहेत, असे लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता ई.टी. सूर्यवंशी यांनी सांगितले.शेतकऱ्यांनीच निगराणी ठेवावीकोल्हापुरी बंधारे हे शासनाची मालमत्ता नसून ती आपलीच मालमत्ता आहे, असे समजून परिसरातील शेतकऱ्यांनी बंधाऱ्याची निगराणी केली पाहिजे. जेणे करुन गेट चोरीचे प्रमाण कमी होईल व गेट बसविल्यानंतर याचा फायदा आपल्याला होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. असे सास्तूर येथील शेतकरी किसन पवार यांनी सांगितले.