शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

भाजीपाला महागल्याने कीचन बजेट कोलमडले

By admin | Updated: July 23, 2014 00:30 IST

कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे.

कडा : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे खरेदीसाठी आलेल्या गृहिणींचे कीचन बजेट कोलमडल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यातील कडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजारपेठ आहे. यामुळे कडा येथे परिसरातील डोंगरगण, खिळद, देवळाली, धानोरा यासह आष्टी व नगर परिसरातील काही व्यापारी, शेतकरी येथे भाजीपाला विक्रीसाठी आणतात. कडा शहरात सर्वात मोठा बाजार भरत असल्याने येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. पावसाळा सुरू होऊन गेल्या दीड महिन्यात पाऊसच पडला नसल्याने याचे परिणाम बाजारावरही दिसून येऊ लागले आहेत. नदी- नाले, तलाव कोरडेठाक पडल्याने चक्क पाणी विकत घ्यायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शेतकऱ्यांचेही सध्या हाल सुरू आहेत. जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध नसल्याने भाजीपाल्यासह इतर पिकांचा तर प्रश्नच येत नाही. तालुक्यात अशी दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने बाजारावर याचा मोठा परिणाम झाला आहे. कडा शहरात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत असल्याने बाजारात सर्रास भाज्यांचे ढिगारे दिसून येत असत. मात्र सध्या शेतकऱ्यांकडे भाजीपाला नसल्याने बाजारातील भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. यामुळे भाजीपाल्यांची महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या टोमॅटो ६० रुपये किलो, कोबी ४० रुपये किलो, पत्ता कोबी ६० रुपये किलो, बटाटे ३० रुपये किलो, वांगे २० रुपये किलो, मेथी जुडी १५ रुपये, पालक १० रुपये, कोथिंंबीर जुडी १० रुपये यासह इतरही भाजीपाल्याचे दर १०० रुपये किलो प्रमाणे आहेत.भाजीपाला महागल्याने १०० ते १५० रुपयांमध्ये लागणारा आठवड्याचा भाजीपाला आता ३०० रुपयांपर्यंत गेल्याचे जगन्नाथ भगत यांनी सांगितले. तर भाजीपाल्याचे विक्रेते नवनाथ तळेकर म्हणाले, यावर्षी अद्यापही पाऊस नसल्याने भाजीपाल्याच्या किमतीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. भाजीपाल्याच्या महागाईची सर्वाधिक झळ महिलांना बसल्याचे दिसून येत आहे. यामुळे महिलांचे कीचन बजेटही कोलमडले आहे. कडा येथे बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर महिला येत असतात. दर आठवडी लागणाऱ्या पैशांच्या प्रमाणात महिलांनी बाजारासाठी पैसे आणले होते. मात्र भाजीपाल्याचे भाव प्रचंड वाढल्याने महिलांना पुरेशी भाजीपाल्याची खरेदीही करता आली नाही. यामुळे काही महिला हिरमुसल्याचे दिसून आले.(वार्ताहर)दुष्काळ जाहीर करण्याची मागणीवांजरवाडा : अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या तर काहींचे खत व बियाणे घरीच आहे़ सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी तालुका विकास संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांकडे सोमवारी केली आहे़ वांजरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरली. मात्र पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.