शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

किशनचंद तनवाणी यांचा भाजपासोबत घरोबा

By admin | Updated: September 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : किशनचंद तनवाणी हे भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

औरंगाबाद : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार किशनचंद तनवाणी हे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करुन भाजपाकडून औरंगाबाद मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. उद्या २७ रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघात निवडणूक आणखी रंगतदार होणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांनी औरंगाबाद मध्य मधून निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली होती. पक्षाकडे तिकिटही मागितले होते. उमेदवारी मिळेल या आशेनेच त्यांनी पराभव समोर दिसत असतानाही आॅगस्ट २०१३ मध्ये झालेली विधान परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली. मात्र, आ. प्रदीप जैस्वाल यांना आॅगस्ट २०१२ मध्ये पक्षाने उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यामुळे तनवाणी यांचा पत्ता कट झाला. निवडणूक लढविण्याच्या हेतूनेच तनवाणी यांनी भाजपासोबत घरोबा करून अनेक वर्षांची शिवसेनेची साथ सोडली.सेनेकडून आ.जैस्वाल यांनी २५ रोजी ‘मध्य’मधून अर्ज भरताच तनवाणी यांची अस्वस्थता वाढली. काल पूर्ण दिवस ते ‘नॉट रिचेबल’ होते. महायुती तुटल्याचे समजताच काल सायंकाळी तनवाणी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते आ. विनोद तावडे यांची भेट घेऊन मध्य मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना उमेदवारी देण्याबाबत शुक्रवारी निश्चित झाले. त्यांच्या भाजपा प्रवेशाचे होर्डिंग्जही गुलमंडीवर झळकले. शिवसेनेचे काही नगरसेवक, पदाधिकारी सोबत असल्यामुळे त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्याने सेनेत अस्वस्थता वाढली आहे. १९८८ पासून सेनेचे काम करीत असलेले तनवाणी यांना पक्षाने शहराध्यक्ष, नगरसेवक, सभागृह नेता, महापौर, आमदार ही पदे दिली. एवढी पदे मिळूनही सेनेशी फारकत घेतली. भाजपात प्रवेश का केला, याचे उत्तर देताना तनवाणी म्हणाले, हिंदुत्ववादी पक्ष आहे, त्यामुळेच प्रवेश केला आहे. निवडणूक लढविणे हादेखील उद्देश त्यामागे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आपली काहीही नाराजी नाही. सेनेत असताना तनवाणी यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवला होता. पक्षाकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेवटी सेनेला सोडचिठ्ठी दिली.