शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

किल्लारी भूकंप, सुरतचा प्लेग आता कोरोना; स्वातंत्र्यप्राप्तीनंतर यंदा तिसऱ्यांदा भरणार नाही कर्णपुरा यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 16:23 IST

Karnapura Yatra Aurangabad News : बिकानेरचे राजा कर्णसिंह हे  १८३५  मध्ये शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या नावानेच कर्णपुरा ओळखला जातो. त्यांनीच येथे देवीचे मंदिर उभारले.

ठळक मुद्देपहिल्यांदाच भाविकांना देवीचे दर्शन नाही नवरात्रीत सुमारे १० ते १२ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. 

औरंगाबाद : नवरात्रोत्सव व कर्णपुरा यात्रा हे समीकरण झाले आहे. संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध असलेली कर्णपुरा यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द केली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागील ७३ वर्षांत   यंदा यात्रा रद्द होण्याची तिसरी वेळ आहे.

बिकानेरचे राजा कर्णसिंह हे  १८३५  मध्ये शहरात वास्तव्यास आले होते. त्यांच्या नावानेच कर्णपुरा ओळखला जातो. त्यांनीच येथे देवीचे मंदिर उभारले. तेव्हापासून येथे नवरात्र उत्सवात यात्रा भरविली जाते. स्वातंत्र्यापूर्वी येथे छोट्या प्रमाणात यात्रा भरत असे; पण नंतर जसजशी शहराची लोकसंख्या वाढत गेली तसतसा यात्रेचा आकार वाढत गेला. नवरात्रीत सुमारे १० ते १२ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. 

राज्यातील व परराज्यातील ७०० विक्रेते याठिकाणी आपले स्टॉल लावत असतात. यातून कोट्यवधीची आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे कर्णपुरा यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील ७३ वर्षांत तिसऱ्यांदा यात्रा रद्द झाली आहे. यात ३० सप्टेंबर १९९३  मध्ये किल्लारीचा भूकंप झाला होता.  त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात  यात्रा भरविण्यात आली नव्हती. दुसऱ्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरतमध्ये  प्लेगची साथ आली होती. त्यावर्षीही कर्णपुरा यात्रा रद्द करण्यात आली होती, असे येथील सामाजिक कार्यकर्ते करणसिंह काकास यांनी सांगितले. 

पहिल्यांदाच भाविकांना देवीचे दर्शन नाही१९९३  व १९९४ या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती; पण भाविकांना देवीच्या दर्शनासाठी मंदिर खुले होते. पहिल्यांदाच नवरात्र उत्सवात यंदा भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे. तसेच यात्राही भरणार नाही. प्रशासनाच्या आदेशानुसार शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी दानवे परिवारातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात येणार आहे. -संतोष दानवे, पुजारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या