शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake :...आणि मदतीचा ओघ सुरू झाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:43 IST

३० सप्टेंबर १९९३ ची ती काळजाचा ठोका चुकवणारी पहाट. किल्लारी आणि परिसरात भूकंपाने क्षणार्धात होत्याचं नव्हतं केलं होतं. राजेंद्र दर्डा यांनी त्याचक्षणी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली. लोकमतची यंत्रणा सतर्क केली. तातडीनं सामाजिक, स्वयंसेवी संस्था-संघटनांची बैठक ‘लोकमत’च्या जवाहर सभागृहात आयोजित केली. या बैठकीतच १ लाख ६९ हजार रुपये जमा झाले. अल्पावधीतच या बैठकीला फार मोठा प्रतिसाद मिळाला. 

- स.सो. खंडाळकर 

२ आॅक्टोबर १९९३ रोजीची दरवर्षीप्रमाणे निघणारी लोकमतची राष्ट्रीय एकात्मता रॅली  रद्द करण्यात आली. भूकंपग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर अन्न, वस्त्र व रोख मदत पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.  या महत्त्वपूर्ण बैठकीला दिवंगत झुल्फिकार हुसेन, प्र.ज. निकम गुरुजी, डॉ. शांताराम काळे, वसंत नरवडे, एम.ए. गफार, राम भोगले, डॉ. पुरुषोत्तम दरख, भागचंद बिनायके, मनसुख बांठिया, मनमोहन अग्रवाल, नगीन संघवी, भिकचंद दोशी, विमल टिबडीवाला, एस.पी. जवळकर, राम पातूरकर, सुभाष झांबड, शरद परिहार, विमल टिबडीवाला, कुलदीपसिंग निºह, व्ही.सी. बजाज, प्रा. शंकरराव वनवे, विनोद मेहरा, चेनराज देवडा, सूरजितसिंग खुंगर, तनसुख झांबड, प्रकाश राठी, दिलीप सोनी, संतोष लुणिया, दिलीप गौर, जगन्नाथअप्पा वाडकर, रतिलाल मुगदिया, फादर मायकेल डिसोझा, एम.के. अग्रवाल, शरद बन्सल, शिवाजी लिंगायत, सतीश सिकची, अनिल मिश्रा, आर.जी. मालानी, त्रिलोक पांडे, दिलीप चोटलानी, शांताराम जोशी, एस.एल. देशमुख, जितेंद्र तोतला, विजय छाजेड, संजय बलदवा, अनिल अग्रवाल, नीरज तोटावार, सत्यनारायण अग्रवाल, सतीश लड्डा, मनोज भारुका, रमेशचंद्र जोशी, शिरीष बोराळकर, रत्नाकर पंडित, अशोक मालू यांच्यासह कितीतरी महत्त्वाची माणसे राजेंद्र दर्डा यांच्या हाकेला ओ देऊन जमा झाली होती. 

भूकंपग्रस्तांसाठी ब्लँकेटस्, सतरंजी, बादली, पातेले, इतर भांडी धान्य घेऊन वाहने रवाना करण्यात आली. मदत नेमकी कोठे व कशी पुरवायची, यासाठी एक समितीही स्थापन करण्यात आली. ही समिती राजेंद्र दर्डा  यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत होती. दिवंगत जवाहरलाल दर्डा हे त्या काळात राज्याचे उद्योगमंत्री होते. भूकंपग्रस्तांना उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणावर मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचा परिणाम म्हणूनही मदतकार्याला वेग आला होता. 

जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक भूमिकातत्कालीन जिल्हाधिकारी प्रमोद माने यांचीही यातली भूमिका अत्यंत सकारात्मक राहिली. आता ते हयात नाहीत; पण भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. लोकमतच्या आवाहनानुसार विविध संस्था-संघटनांनी मोठा पुढाकार घेतला. पहाटेच्या काळोखात गाडल्या गेलेल्या खेड्यांना दिलासा देण्याचं व त्यांच्यासाठी काही तरी करीत राहण्याची भूमिका लोकमतनं सातत्यानं घेतली. त्याचाच एक भाग म्हणून १९९६ साली सास्तूर येथे अंगणवाड्या उभारण्यात आल्या. राजेंद्र दर्डा यांचा यातला सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन, त्यांच्या हाकेला ओ देऊन पुढे आलेली मंडळी व लोकमतचे उत्कृष्ट टीमवर्क यातूनच हे महत्कार्य घडत गेलं.  

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपAurangabadऔरंगाबादRajendra Dardaराजेंद्र दर्डा