शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

खरीपात तूर, रबीत गव्हाने शेतकरी आशादायी

By admin | Updated: February 5, 2017 23:25 IST

बीड :खरीपातील तुरीला या पावसामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने एकरी उत्पदादनही वाढले आहे.

बीड : जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अतिवृष्टीमुळे एका रात्रीत चित्र पलटले होते. खरीपातील तुरीला या पावसामुळे पोषक वातावरण तयार झाल्याने एकरी उत्पदादनही वाढले आहे. शिवाय मुबलक पाणीसाठ्याच्या जोरावर रबीतील गव्हाचे पिक जोमात आहे. या प्रमुख पिकांनी तारल्याने शेतकरी सुखावला आहे. खरीपातील सर्वच पिकांची अवस्था तळ्यात-मळ्यात अशी होती. त्या अतिवृष्टीमुळे हरभरा, बाजरी पिक जमिनदोस्त झाले होते. केवळ तुरीला पावसाचा फायदा झाल्याने उत्पादनात वाढ होत आहे. सद्य स्थितीला तुरीची काढणी अंतिम टप्प्यातून असून, गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत येथील कृउबाच्या खरेदी केंद्रावर तब्बल २९ हजार क्ंिवटलची आवक झाली आहे. दिवसाकाठी दोन हजार क्विंटल तूर दाखल होत असून, गतवर्षी केवळ सहा हजार क्विंटल तुरीचे उत्पादन झाले होते. यंदा पाच पटीने उत्पादन वाढले आहे. रबीतील गव्हाचा पेरा ४० हजार हेक्टरवर झाला आहे. सर्वच पिके उत्तम स्थितीत असून, मुबलक प्रमाणावर पाणी मिळत असल्याने गहू जोमात आहे. त्यामुळे रबीतील काही पिके वगळता अतिवृष्टीचा फायदाच झाला आहे. पाणी साठे तुडूंब भरले असून, शेततळ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवला आहे. तुरीला खरेदी केंद्रांवर ५०५० रूपये दर मिळत असून, एकरी उत्पादनही अधिक प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती सुधारत आहे. (प्रतिनिधी)