शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

खाम स्वच्छता, ७०० वृक्षांचे रोपण, ५ टन सुका कचरा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:02 IST

औरंगाबाद : खाम नदीच्या स्वच्छतेसाठी काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या आठवड्यात लोकसहभागातून स्वच्छता आणि ...

औरंगाबाद : खाम नदीच्या स्वच्छतेसाठी काही दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या आठवड्यात लोकसहभागातून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. मनपा कर्मचारी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांनी मिळून ७०० झाडे लाविली, ५ टन सुका कचरा उचलला.

महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी बोर्ड, व्हेराॅक आणि इको-सत्व यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पाअंतर्गत खाम नदी पुनरुज्जीवन मोहीम राबविण्यात येत आहे. दर शनिवारी लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्यात येत आहे. शनिवारी (दि.१३) सकाळी ७ ते १० या वेळेत लोकसहभागातून लोखंडी पुलापासून बारापुला गेटपर्यंत स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्यात आले. खाम नदीच्या स्वच्छता मोहिमेत पहिल्या टप्प्यात नदीपात्राचे रुंदीकरण, नदीच्या काठावर टाकलेला कचरा काढून टाकणे, भूमिगत गटार यंत्रणेत ओपन सीवेज जोडणे, सांडपाण्यावर प्रक्रिया आदी डिझाइन उपक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय नदीकाठच्या बाजूला वृक्षारोपण आणि रिव्हरफ्रंटचा विकास करण्यात येणार आहे. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे, छावणी बोर्ड औरंगाबादचे सीईओ विक्रांत मोरे, औरंगाबाद शहरचे एसीपी (वाहतूक) सुरेश वानखेडे, इको सत्त्वच्या नताशा झरीन, गौरी मिराशी आणि सिद्धार्थ बनसोड, मनपा स्वछता निरीक्षक असदुल्ला खान व अन्य उपस्थित होते.

गरवारे कंपनीतर्फे सहभागी नागरिकांना बिस्किट्स देण्यात आले. या वेळेस मिलिंद कॉलेज ऑफ सायन्सचे एनसीसीचे विद्यार्थी, लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले, डॉ. सूरज बनसी, डॉ. महेंद्र वाहूळ, डॉ. प्रियानंद आगळे, प्रयास युथ फाउंडेशन, वी फोर एन्व्हायरमेंट, इको नीडस फाउंडेशन, लाइफ केअर आणि छावणी जन अधिकार मंच सदस्यांनी सहभाग नोंदवला. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, ही लोकसहभाग मोहीम दर शनिवारी राबवण्यात येणार आहे.