शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

पुतण्याच्या वॉर्डातून काकांना अल्प मते, तर महापौरांच्या वॉर्डातही ट्रॅक्टरचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:01 PM

केंद्रनिहाय मतांची गोळाबेरीज ठरणार मारक 

ठळक मुद्दे शिवसेनेला पश्चिम, कन्नड, वैजापूर मतदारसंघांतून मताधिक्य मिळालेशहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड पीछेहाट झाली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागल्यानंतर आता मतदान केंद्रनिहाय विश्लेषण सुरू झाले आहे. माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा अल्पमतांनी पराभव करीत इम्तियाज जलील यांनी संसदेत मार्ग मिळविला. हा पराभव शिवसेनेच्या प्रचंड जिव्हारी लागला असून, कुणाच्या वॉर्डातून किती मते मिळाली याचा आकडा आता समोर येऊ लागला आहे. माजी खा.खैरे यांचे पुतणे तथा नगरसेवक सचिन खैरे, मुलगा ऋषिकेश खैरे यांच्या वॉर्डातून खा. इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जास्तीची मते मिळाली आहेत. 

सहा मतदारसंघांतील मतदान केंद्रनिहाय आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्यानंतर त्यातील गोळाबेरीज सुरू झाली आहे. प्रशासनाने मतदान केंद्र क्रमांकनिहाय मतदानाचे आकडे दिल्यामुळे नेमके कोणत्या वॉर्डातील केंद्रावर किती मते शिवसेना, काँग्रेस, एमआयएम, अपक्ष उमेदवाराला मिळाली याचा आढावा घेण्यात येत आहे. सचिन खैरे यांच्या बेगमपुरा वॉर्डातून शिवसेनेला १६०० च्या आसपास, तर अपक्ष उमेदवार जाधव यांना १९०० च्या आसपास मतदान झाले आहे. विशेष म्हणजे एमआयएमला मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले आहे. शिवसेना नगरसेवक असताना येथे मताधिक्य मिळू शकले नाही. तसेच खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांच्या समर्थनगर वॉर्डातूनही शिवसेनेला कमी मतदान झाले आहे. तेथे अपक्ष आणि एमआयएमने बऱ्यापैकी मतदान घेतले आहे. तसेच विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले तरी,जवळपास १२०० च्या आसपास मते अपक्ष उमेदवार जाधव यांना मिळाली आहेत. तेथे २२८२ मते शिवसेनेला मिळाली.

सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर शिवसेनेला पश्चिम, कन्नड, वैजापूर मतदारसंघांतून मताधिक्य मिळाले असले तरी ते निर्णायक ठरलेले नाही. शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड पीछेहाट झाली आहे. भाजप नगरसेवक असलेल्या वॉर्डातून शिवसेनेचे मताधिक्य घटले आहे. पूर्व मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तरी एमआयएम ७२५ मतांनी पुढेच आहे. 

महापौरांच्या वॉर्डात ट्रॅक्टरचा धक्कामहापौर नंदकुमार घोडेले यांच्या वॉर्डातही शिवसेनेला ट्रॅक्टरने धक्का दिला आहे. अपक्ष उमेदवार जाधव व शिवसेनेला बरोबरीचे मतदान झाले आहे.ईटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी या पट्ट्यात अपक्ष उमेदवार जाधव यांना चांगले मतदान झाले आहे. ४४४२ मतांनी खैरेंचा पराभव झाला असल्यामुळे तो जिव्हारी लागण्यासारखा आहे. शिवसेना नगरसेवकांसह खैरे यांच्या नजीकच्या नगरसेवकांंच्या प्रभावाची थोडी जादू चालली असती, तर हा पराभव झाला नसता असे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालAurangabadऔरंगाबाद