शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खैरे यांनीच लावली जिल्ह्याची ‘वाट’; भाजपचे कराड यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 11:34 IST

दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.भाजप उमेदवार आयात करणार असे विधान राष्टवादीचे आ. सतीश चव्हाण यांनी केले होते यावर त्यांनी राष्टवादीने अगोदर आपल्या पक्षाची वाताहत थांबवावी असे मत व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

एका पत्रकार परिषदेत कराड यांनी खैरे यांच्या तीन दशकांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. चिकलठाणा, एमआयडीसी वाळूज या भागात एकही मोठी कंपनी त्यांना आणता आली नाही. मग बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल? जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागलेली आहे. रस्ते गुळगुळीत व्हावेत असे त्यांना अजिबात वाटत नाही. पक्षातील दोन नेत्यांमध्ये भांडणे लावून देणे. निवडणुका आल्यावर संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित करणे, हा एकमेवर उद्योग ते करीत आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच युतीच्या बाजूने निर्णय घेतले. अलीकडे खैरे यांनी अत्यंत दळभद्री युती सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत युती केली. फुलंब्रीत काँग्रेस-राष्टÑवादीसोबत युती केली. फुलंब्रीत, तर भगवा रुमालही त्यांनी गळ्यातून काढून बाजूला ठेवला. त्यांच्या या ढोंगीपणाचे उत्तर मतदारांनी दिले. तीन वर्षांपूर्वी अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. मग आजपर्यंत पुतळा का उभारला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवालही कराड यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी महापौर बापू घडमोडे, संजय खंबायते, जालिंदर शेंडगे, व्यंकटेश कमळू, मोहनराव आहेर, राम बुधवंत उपस्थित होते.

चव्हाण यांनी राष्टवादीची वाताहत थांबवावीभाजप हा राष्ट्रीय पातळीवरील एक मोठा पक्ष आहे. या पक्षात लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची अक्षरश: फौज उभी आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजप औरंगाबाद जिल्ह्यात लढविणार म्हणजे लढविणारच, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. भाजप उमेदवार आयात करणार असे विधान राष्टवादीचे आ. सतीश चव्हाण यांनी केले होते. राष्टवादीने अगोदर आपल्या पक्षाची वाताहत थांबवावी. राष्टवादीचे देशात फक्त चार खासदार, राज्यात केवळ ४० आमदार, जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढे जि.प. सदस्य आहेत. नगराध्यक्ष तर नाहीत. दुस-याच्या पक्षात डोक्यावण्यापेक्षा स्वत: संघटन मजबूत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शरद पवार यांच्यानंतर पक्षाची काय अवस्था होईल, याचाही विचार चव्हाण यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.

पक्षाने उमेदवारी दिली तर...खैरे यांच्यावर राजकीय तोफ डागण्यामागचे कारण काय? या थेट प्रश्नावर कराड यांनी मी पण एक इच्छुक उमेदवार असल्याचे नमूद केले. पक्षाकडे आतापर्यंत आठ ते दहा जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच पक्षाचे निरीक्षकही शहरात आले होते. त्यांनी आढावा घेऊन कामाला लागा, असा आदेश दिल्याचे कराड यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrakant Khaireचंद्रकांत खैरेSatish Chavanसतीश चव्हाण