शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

खैरे यांनीच लावली जिल्ह्याची ‘वाट’; भाजपचे कराड यांचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 11:34 IST

दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देप्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.भाजप उमेदवार आयात करणार असे विधान राष्टवादीचे आ. सतीश चव्हाण यांनी केले होते यावर त्यांनी राष्टवादीने अगोदर आपल्या पक्षाची वाताहत थांबवावी असे मत व्यक्त केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भावनिक राजकारण करून मते मिळविण्याचा धंदा त्यांनी लावला असून, यंदा सुजाण मतदार त्यांना धडा शिकवणार असल्याचे मत भाजपचे राज्य उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

एका पत्रकार परिषदेत कराड यांनी खैरे यांच्या तीन दशकांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. चिकलठाणा, एमआयडीसी वाळूज या भागात एकही मोठी कंपनी त्यांना आणता आली नाही. मग बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल? जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागलेली आहे. रस्ते गुळगुळीत व्हावेत असे त्यांना अजिबात वाटत नाही. पक्षातील दोन नेत्यांमध्ये भांडणे लावून देणे. निवडणुका आल्यावर संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित करणे, हा एकमेवर उद्योग ते करीत आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच युतीच्या बाजूने निर्णय घेतले. अलीकडे खैरे यांनी अत्यंत दळभद्री युती सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत युती केली. फुलंब्रीत काँग्रेस-राष्टÑवादीसोबत युती केली. फुलंब्रीत, तर भगवा रुमालही त्यांनी गळ्यातून काढून बाजूला ठेवला. त्यांच्या या ढोंगीपणाचे उत्तर मतदारांनी दिले. तीन वर्षांपूर्वी अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याची घोषणा केली. मग आजपर्यंत पुतळा का उभारला नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा सवालही कराड यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी महापौर बापू घडमोडे, संजय खंबायते, जालिंदर शेंडगे, व्यंकटेश कमळू, मोहनराव आहेर, राम बुधवंत उपस्थित होते.

चव्हाण यांनी राष्टवादीची वाताहत थांबवावीभाजप हा राष्ट्रीय पातळीवरील एक मोठा पक्ष आहे. या पक्षात लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची अक्षरश: फौज उभी आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजप औरंगाबाद जिल्ह्यात लढविणार म्हणजे लढविणारच, असेही डॉ. कराड यांनी सांगितले. भाजप उमेदवार आयात करणार असे विधान राष्टवादीचे आ. सतीश चव्हाण यांनी केले होते. राष्टवादीने अगोदर आपल्या पक्षाची वाताहत थांबवावी. राष्टवादीचे देशात फक्त चार खासदार, राज्यात केवळ ४० आमदार, जिल्ह्यात बोटावर मोजण्याएवढे जि.प. सदस्य आहेत. नगराध्यक्ष तर नाहीत. दुस-याच्या पक्षात डोक्यावण्यापेक्षा स्वत: संघटन मजबूत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. शरद पवार यांच्यानंतर पक्षाची काय अवस्था होईल, याचाही विचार चव्हाण यांनी करावा, असे त्यांनी सांगितले.

पक्षाने उमेदवारी दिली तर...खैरे यांच्यावर राजकीय तोफ डागण्यामागचे कारण काय? या थेट प्रश्नावर कराड यांनी मी पण एक इच्छुक उमेदवार असल्याचे नमूद केले. पक्षाकडे आतापर्यंत आठ ते दहा जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. अलीकडेच पक्षाचे निरीक्षकही शहरात आले होते. त्यांनी आढावा घेऊन कामाला लागा, असा आदेश दिल्याचे कराड यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrakant Khaireचंद्रकांत खैरेSatish Chavanसतीश चव्हाण