शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:24 IST

आपला पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला.

औरंगाबाद : ‘उंच- सडपातळ बांधा’ यासारखी नफेखोर कंपन्यांनी निर्माण केलेली सौंदर्याची प्रतीके मनावर बिंबवून आपण आपल्या पारंपरिक आहारापासून दूर जात आहोत. तूप, मीठ, साखर, स्थानिक खाद्यपदार्थ टाळून आपण सलाद, किनोआ, सूप अशा विदेशी अन्नपदार्थांचे सेवन करीत आहोत. मात्र, आपल्या पूर्वजांच्या अफाट ज्ञानातून तयार झालेला आपला पारंपरिक आहारच खºया अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असा मोलाचा सल्ला आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी दिला.‘वाईडर आॅपॉर्च्युनिटीज् फॉर वूमेन’ (वॉव) या संस्थेच्या वतीने रविवारी (दि.२४) प्रेसिडेंट लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी ‘सखी मंच’च्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा आणि ‘वॉव’च्या संस्थापक अध्यक्षा रुचिरा दर्डा उपस्थित होत्या.करिना कपूर व आलिया भटसह सिनेक्षेत्रातील अनेक आघाडीच्या सेलिब्रिटींच्या आहारतज्ज्ञ म्हणून ऋतुजा काम करतात.भारतीय आहाराचे महत्त्व विशद करताना त्यांनी तुपाविषयीचे अनेक गैरसमज खोडून काढले. तुपाअभावी व्हिटॅमिन ‘डी’ कमी होते, ज्यामुळे भूक न लागणे, चीडचीड वाढणे, झोप न येणे, मासिक पाळी अनियमित होणे, थायरॉइडच्या समस्या, सततचे आजारपण, केस गळती अशा समस्या सुरू होतात. यावर उपाय म्हणजे रोजच्या जेवणात तूप असायलाच हवे, अशी माहिती त्यांनी दिली.‘पूर्वी एखाद्या घराची श्रीमंती तेथील तूप आणि दुग्धजन्य पदार्थांवरून ठरविली जाई. मात्र, विदेशी अन्न कंपन्यांनी भारतीय खाद्यपदार्थांचे महत्त्व कमी केले; परंतु आता जगालादेखील भारतीय आहारशास्त्राचे महत्त्व कळाले आहे. आपली आजी हीच सर्वात हुशार ‘डाएटिशन’असते. तिच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका, असा संदेश दिवेकर यांनी दिला.