शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

एक तर आम्हाला ठेवा; नाही तर आमदाराला ठेवा

By admin | Updated: October 10, 2016 01:10 IST

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तालुक्यातील सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र उपसले आहे.

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आ. हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात तालुक्यातील सेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र उपसले आहे. उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुखांपर्यंतच्या सुमारे ३०० पदाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी एक तर आम्हाला ठेवा, नाही तर आमदाराला पक्षात ठेवा, अशी भूमिका खा. चंद्रकांत खैरे यांच्यासमोर मांडली. कन्नड मार्केट कमिटी, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पूर्ण संघटना आमदाराच्या विरोधात जाणे हे घातक असल्यामुळे खा. खैरे यांनी शिवसैनिक बचाव करण्याचा पवित्रा घेतला आहे. जाधव शिवसेनेचे आमदार असताना त्यांनी कन्नडमधील सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. ती आघाडी पालकमंत्री रामदास कदम यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेत विलीन करण्यात आल्याची घोषणा केली. त्या घोषणेनंतर आ. जाधव समर्थकांनी सोशल मीडियातून येणाऱ्या सर्व निवडणुकांत उमेदवार जाहीर करून टाकले. तालुक्यात शिवसेना उभी करणाऱ्यांना डावलून आ. जाधव यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्याने सर्व शिवसेना संघटना पदाधिकाऱ्यांचे पित्त खवळले. जाधव अरेरावीची भाषा करतात. शिवराळ भाषेत पदाधिकाऱ्यांना बोलतात, असा आरोप करीत पदाधिकाऱ्यांनी तातडीने रविवारी रेल्वेस्टेशन येथील खा. खैरे यांचे निवासस्थान गाठून राजीनामा देण्याची तयारी सुरू केली. \आ.जाधव यांची भूमिका पक्षशिस्तीच्या विरोधात आहे. त्यांच्या विरोधात पूर्ण शिवसैनिक राजीनामा देण्यासाठी आले होते. नगराध्यक्षपद महिला ओबीसी प्रवर्गासाठी गेले, नाचनवेल या जि.प. सर्कलचे चार तुकडे झाले. त्यामुळे जाधव यांनी आघाडी शिवसेनेत विलीन केली, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. पालकमंत्र्यांनी आम्हाला अजून काहीही आदेश दिले नाहीत, असे असताना जाधव यांनी उमेदवार जाहीर करून टाकले हे पक्षात चालणार नाही. शिवसैनिक सांभाळायचे आहे, पक्षप्रमुखांशी चर्चा करूनच तेथील निर्णय होईल. शिवसेना-भाजप युतीसाठी बोलणी सुरू असताना त्यांनी आघाडी स्थापन करून उमेदवारही जाहीर केले. पालकमंत्र्यांना त्यांनी काय सांगितले हे आम्हाला माहिती नाही, असे खा. चंद्रकांत खैरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जुन्या पदाधिकाऱ्यांकडे निवडणुकांच्या अनुषंगाने व्यूहरचना नव्हती. त्यामुळे विकास आघाडी स्थापन केली; परंतु पालकमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आघाडी विलीन केली. तसेच पालकमंत्र्यांनी मला शिवसेनेचा आमदार असल्याने उमेदवारी जाहीर करण्याच्या सूचना केल्या. बंड करणाऱ्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीदेखील नाही. त्यांची राजकीय अवकातही तपासली पाहिजे. पक्षाने सांगितल्याने आघाडी विलीन केली. त्यामुळे बदल करायचा असेल तर पक्षाने ठरवावे, असे आ. हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले.