शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

'अफवा टाळा, शहर शांत ठेवा'; किराडपुऱ्यातील राड्यानंतर लोकप्रतिनिधींचे आवाहन

By विकास राऊत | Updated: March 30, 2023 20:12 IST

किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात विधीवत जन्मसोहळा पार पडल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मंदिराला भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग नोंदविला. 

छत्रपती संभाजीनगर : किराडपुऱ्यात २९ मार्चच्या मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या राड्यानंतर केंद्र व राज्यशासनातील मंत्री आणि सनदी अधिकार्यांनी शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. गुरूवारी दुपारी किराडपुऱ्यातील श्रीराम मंदिरात विधीवत जन्मसोहळा पार पडल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांनी मंदिराला भेट देऊन महाआरतीमध्ये सहभाग नोंदविला. 

यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये आ.प्रदीप जैस्वाल, भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, ठाकरे गटाचे माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, संजय खंबायते, लक्ष्मीकांत थेटे आदींची उपस्थिती होती.

संयम व शांतता ठेवाकिराडपुऱ्यात राडा करून जनभावनांमध्ये तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई होईलच. ज्यांनी हे घडवून आणले ते सुटणार नाहीत. नागरिकांनी संयम व शांतता ठेवावी.- डॉ.भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

दोषींवर कारवाई होणारकिराडपुर्यातील घटनेमागे जे आरोपी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. उत्सवांना गालबोट न लागता शांततेत सर्व कार्यक्रम पार पाडण्याचे आवाहन आहे.-संदिपान भूमरे, पालकमंत्री

अफवांवर विश्वास ठेऊ नकाराम मंदिर परिसरात काहीही नुकसान झालेले नाही. घटनेबाबतच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. सर्व जनतेने शांततेने व संयमाने यापुढील सण साजरा करावेत.-अतुल सावे, सहकार मंत्री

शांतता राखावीघटनास्थळी पाहणी केली आहे. पोलिस यंत्रणेला कुमक वाढविण्याच्या सुचना केल्या आहेत. शासनाला देखील याबाबतची माहिती दिली असून सर्वांना शांतता राखावी.-सुनील केंद्रेकर, विभागीय आयुक्त

शासना माहिती दिलीमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यसचिवांना घटनेची माहिती दिली आहे. समाज कंटकांवर कारवाई होईलच. यापुढील उत्सव नागरिकांनी आनंदाने साजरा करावेत.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी

उच्चस्तरीय चौकशी व्हावीया घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई झालीच पाहीजे. नागरिकांनी शांतता बाळगावी. पोलिस घटनास्थळी उशीरा का आले हे तपासले पाहिजे.- इम्तियाझ जलील, खासदार

घटनेमागे एमआयएम, भाजपकिराडपुर्यातील घटनेमागे एमआयएम आणि भाजप जबाबदार आहे. नागरिकांनी संयम व शांतता पाळावी. घटनेची चौकशी करून समाजकंटकांवर कठाेर करावाई व्हावी.-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलSandipan Bhumreसंदीपान भुमरेAmbadas Danweyअंबादास दानवे