शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

आयुष्याच्या शिदोरीवर ‘केबीसी’चा डल्ला !

By admin | Updated: July 17, 2014 00:26 IST

मोहन बोराडे, सेलू सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे.

मोहन बोराडे, सेलूशासकीय सेवेत जमविलेली सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे. केबीसीचा घोटाळा उघड झाल्यानंतर तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले असून, या घोटाळ्यासंदर्भात जागोजागी चर्चा सुरू आहे. तालुक्यातील गुंतवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांचा घरात असल्याचे समजते. सेलू तालुक्यात दोन वर्षांपासून केबीसी कंपनीने एजंटामार्फत आपले जाळे पसरविले. हजारो नागरिकांकडून करोडो रुपयांची माया जमा केली. सुरुवातीच्या काळात गुंतविलेल्या रक्कमेचे सांगितल्याप्रमाणे हप्ते गुंतवणुकदारांना मिळाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करीत या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी या कंपनीत पैसे गुंतविले. सहा महिन्यापांसून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळत नव्हता. परंतु आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर कोणीही तक्रार नोंदविली नाही. परंतु कंपनीचे प्रमुख पसार झाल्याच्या बातम्या आल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. सेलू व परिसरात अल्पावधीत दामदुप्पट रक्कमेचे अमिष दाखवून केबीसी कंपनीने एजंटामार्फत आपले जाळे वाढविले. त्यामुळे सेलू येथे अनेक मेळावेही या कंपनीने घेतले. काही एजंटांना विदेशवारीही घडविली. त्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण या कंपनीच्या जाळ्यात अडकले. मित्र कंपनी, नातेवाईकांनाही त्यांनी या कंपनीत गुंतवणुकीसाठी आग्रह धरला. त्यामुळे जवळचा माणूस पाहून अनेकांनी मोठ्या रकमा कंपनीत गुंतविल्या. परंतु काही दिवसांपासून कंपनीकडून पैसे वेळेवर येत नसल्यामुळे गुंतवणुकदार हवालदिल झाले व एजंटांना पैशांची मागणी करू लागले आहेत. विशेष करून नोकरदार महिला व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर या कंपनीत गुंतवणूक आहे. महिलांनीही या कंपनीत मोठ्या आशेने गुंतवणूक केली आहे. दरम्यान रक्क्म परत मिळेल की नाही? या विवंचनेत गुंतवणूकदार आहेत.सेलूत अनेक कंपन्यांचे पेवकेबीसीसह अल्पावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या कंपन्यांचे सेलू व परिसरात मागील काही वर्षापासून पेव फुटले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नोकरदार मंडळींना आपल्या जाळ्यात अडकवून करोडो रुपये अनेक कंपन्यांनी गिळंकृत केले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील काही बोलक्या मंडळींना हाताशी धरून दामदुप्पट रक्कम देण्याच्या अमिषाने शेकडो नागरिकांनी या कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले. सामान्य एजंटही चारचाकी गाड्यात फिरू लागले. अनेकांची देहबोली बदलली, राहणीमानही बदलू लागले. हे पाहून अनेक जण या कंपनीच्या मोहात अडकले. परिणामी लवकरच या कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याने अनेकांना गाव सोडण्याची वेळ आली आहे. दरम्यान सेलू व परिसरात अशा कंपन्यांमध्ये शेकडो नागरिकांनी कोट्यवधी रुपये गुंतवविलेले आहेत.