शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

कारगिल स्मृतिवन अद्याप ओसाडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 19:46 IST

निर्णय होत नसल्यामुळे बारा वर्षांपासून मैदान मोकळेच

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी आर्मीने घेतला ताबा 

औरंगाबाद : महापालिकेला सात वर्षांमध्ये काहीही करता आले नाही म्हणून आर्मीने पाच वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेले कारगिल स्मृतिवन विकसित न झाल्यामुळे तेथे रात्री तळीरामांचा अड्डा जमतो आहे. जे पालिकेच्या ताब्यात असताना झाले, तेच आर्मीच्या अनुशासनात होऊ लागल्याने ती जागा ओसाड पडू लागली आहे. यंत्रणा कुठलीही असो, इच्छाशक्तीविना काहीही होत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. 

१९९९ साली कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गारखेडा परिसरातील आर. बी. हिल्सलगत कारगिल स्मृतिवन निर्माण करण्याचा निश्चय पालिकेने २००७ मध्ये केला. २०१३ पर्यंत पालिकेने काहीही न केल्यामुळे आर्मीने जागेचा ताबा घेतला. परंतु आर्मीनेदेखील त्या स्मृतिवनाच्या निर्मितीकडे कानाडोळा केल्याचे दिसते आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात येणारे कारगिल स्मृतिवन मनपाच्या विस्मृतीत गेल्याने आर्मीच्या ताब्यात देण्यासाठी माजी नगरसेवक पंकज भारसाखळे आणि तत्कालीन आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांनी ५ वर्षांपूर्वी निर्णय घेतला. कारगिल युद्ध विजयाला २६ जुलै रोजी २० वर्षे पूर्ण होत आहेत. 

तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत गारखेडा परिसर आर. बी. हिल्सच्या शेजारी ३ एकर जागेमध्ये कारगिल स्मृतिवन भूमिपूजनाचा कार्यक्रम २००७ मध्ये झाला होता. २० लाख रुपये खर्चून हे स्मृतिवन विकसित करण्याची घोषणा झाली. २६ जानेवारी २००९ पर्यंत हे स्मृतिवन शहरवासीयांना पाहायला मिळेल, असा दावा मनपा आणि जिल्हा प्रशासनाने केला होता. २००९ मध्ये मनपाने उद्यानासाठी काढलेल्या निविदा रद्द झाल्या. मनपाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे या स्मृतिवनाच्या कामाकडे दुर्लक्ष झाले.  या स्मृतिवनाच्या निर्मितीत ज्यांचे योगदान लाभणार होते. त्यातील काही जणांचे निधन झाले. २०१४ मध्ये माजी नगरसेवक भारसाखळे, तत्कालीन आयुक्त डॉ. कांबळे यांच्या मध्यस्थीने ती जागा संचालक, सैनिक कल्याण मंडळ यांच्याकडे देण्यात आल्यावर शिवसेना-भाजप असा वादही निर्माण झाला. २०१४ मध्ये त्या जागेत मंडळातर्फे एक खोली बांधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. २०१५ व २०१६ मध्ये तेथे कुठलाही कार्यक्रम झाला नाही. २०१७ व २०१८ सालीदेखील कुठल्याही कार्यक्रमाचे नियोजन नव्हते. यावर्षीही कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन तेथे नाही. 

लवकरच काम सुरू करण्याचा दावाआर्मीकडे हे काम पाहण्यासाठी अधिकारीच उपलब्ध नाहीत. मे.कुलथे यांनी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील अधिकाऱ्याकडे पदभार देण्यात आला. कॅ.जगताप यांच्याकडे पदभार आल्यानंतर त्यांनी स्मृतिवन विकसित करण्यासाठी हालचाली केल्या; परंतु त्यांचीही बदली झाली. कर्नल जतकर यांनी सीएसआरमधून निधी उपलब्ध केला. निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र माहिती अधिकाराच्या फेऱ्यात त्या निविदा रखडल्या. स्मृतिवन विकासाचा मास्टर प्लॅन तयार आहे. परंतु देखरेखीसाठी अधिकारी नाही. रिएम्लॉयमेंटच्या सिस्टीममधून अधिकारी, कर्मचारी आर्मीला मिळतात. त्यांना ४ ते ५ वर्षे काम करण्याची संधी मिळते. त्यातही त्यांची बदली होत असल्याने या कामाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. दरम्यान, माजी नगरसेवक पंकज भारसाखळे यांनी सांगितले, २४ जुलै रोजी पुण्यात बैठक झाली असून, येत्या काही महिन्यांत स्मृतिवन विकासाचे काम सुरू होईल. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनAurangabadऔरंगाबादIndian Armyभारतीय जवान