शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

By विकास राऊत | Updated: May 18, 2024 13:16 IST

सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले. मतदान केंद्रांवरील आकडे शिवसेना, एमआयएम आणि ठाकरेसेनेत ‘काँटे की टक्कर’ होईल, असे सांगत आहेत. सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झाल्याचे प्राथमिकरीत्या दिसते. शहरी भागातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर ८० ते ९० टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान एमआयएमच्या आशा पल्लवीत करीत आहेत. तर त्या तुलनेत हिंदूबहुल भागातील केंद्रांवरही ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केंद्रांचा आकडा मोठा असल्यामुळे महायुतीने विजयाचे गणित मांडत आहे. हिंदू वसाहतींमध्ये वाढलेल्या मतदानामुळे ठाकरे गटाला मोठी अपेक्षा आहे. तर वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या पारड्यात किती मते गेली, याची आकडेमोड राजकीय पक्ष करीत आहेत.

शहर व ग्रामीण मतदानाची तुलना

शहरात झालेले मतदान : ६ लाख ५३ हजार ९१७ग्रामीणमध्ये झालेले मतदान : ६ लाख ४५ हजार १२३शहरात ग्रामीणपेक्षा ८ हजार ७९४ मतदान जास्तएकूण मतदान : १२ लाख ९९ हजार ४०

७० टक्क्यांहून अधिक मतदान किती केंद्रांवर?कन्नड : ३५९..............७०औरंगाबाद मध्य : ३१६.....६०औरंगाबाद पश्चिम : ३७४.......६०औरंगाबाद पूर्व : ३०५......७०गंगापूर : ३४८..........६०वैजापूर : ३३८........५५एकूण : ३७५

मुस्लिम पट्ट्यांतील बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदानशहरातील तिन्ही मतदारसंघांत मुस्लिम मतदान असलेल्या मतदान केंद्रांची संख्या ३०० च्या आसपास आहे. त्यावर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केेंद्रांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर उर्वरित बूथवर ६० ते ७० टक्के मतदान झाले आहे.

हिंदूबहुल भागातही दणकावून मतदानशहरातील ९९५ पैकी सुमारे ६९५ मतदान केंद्र हिंदू आणि दलित व इतर मतदारांचे प्राबल्य असलेले आहेत. त्यातील हिंदूबहुल प्राबल्य असलेल्या ८० टक्के बूथवर दणकावून मतदान झाले आहे. या वाढलेल्या मतदानावर महायुती आणि महाविकास आघाडीसह एमआयएमदेखील दावा करीत आहे.

ग्रामीण भागात किती बूथ ८० टक्क्यांच्या पुढे?ग्रामीण भागात १०२५ मतदान केंद्र आहेत. त्यातील ४०० बूथवर ८० टक्क्यांपेक्षा जास्तीचे मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यात गंगापूर, वैजापूर, कन्नडमधील मतदान केंद्रांचा समावेश आहे. यात गंगापूर ६०, वैजापूर ५० तर कन्नडमध्ये ६० बूथवर मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.

कुणाचे गणित काय?ग्रामीण भागात झालेल्या मतदानाच्या तुलनेत शहरातील तिन्ही मतदारसंघात ८ हजार ७९४ मतदान जास्त झाले. एमआयएमची भिस्त शहरातील मतदान केंद्रांवर अधिक आहे. ग्रामीण भागात मुस्लिम मतदान आणि काही प्रमाणात दलित व हिंदू मतदानांमुळे विजय होण्याची अपेक्षा एमआयएमला आहे. महायुती २०४० मतदान केंद्रांपैकी सुमारे १७०० मतदान केंद्रांवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत आहे. तर ठाकरे गट २०४० बूथवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत विजयाचे गणित मांडत आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४