शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

By विकास राऊत | Updated: May 18, 2024 13:16 IST

सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले. मतदान केंद्रांवरील आकडे शिवसेना, एमआयएम आणि ठाकरेसेनेत ‘काँटे की टक्कर’ होईल, असे सांगत आहेत. सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झाल्याचे प्राथमिकरीत्या दिसते. शहरी भागातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर ८० ते ९० टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान एमआयएमच्या आशा पल्लवीत करीत आहेत. तर त्या तुलनेत हिंदूबहुल भागातील केंद्रांवरही ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केंद्रांचा आकडा मोठा असल्यामुळे महायुतीने विजयाचे गणित मांडत आहे. हिंदू वसाहतींमध्ये वाढलेल्या मतदानामुळे ठाकरे गटाला मोठी अपेक्षा आहे. तर वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या पारड्यात किती मते गेली, याची आकडेमोड राजकीय पक्ष करीत आहेत.

शहर व ग्रामीण मतदानाची तुलना

शहरात झालेले मतदान : ६ लाख ५३ हजार ९१७ग्रामीणमध्ये झालेले मतदान : ६ लाख ४५ हजार १२३शहरात ग्रामीणपेक्षा ८ हजार ७९४ मतदान जास्तएकूण मतदान : १२ लाख ९९ हजार ४०

७० टक्क्यांहून अधिक मतदान किती केंद्रांवर?कन्नड : ३५९..............७०औरंगाबाद मध्य : ३१६.....६०औरंगाबाद पश्चिम : ३७४.......६०औरंगाबाद पूर्व : ३०५......७०गंगापूर : ३४८..........६०वैजापूर : ३३८........५५एकूण : ३७५

मुस्लिम पट्ट्यांतील बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदानशहरातील तिन्ही मतदारसंघांत मुस्लिम मतदान असलेल्या मतदान केंद्रांची संख्या ३०० च्या आसपास आहे. त्यावर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केेंद्रांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर उर्वरित बूथवर ६० ते ७० टक्के मतदान झाले आहे.

हिंदूबहुल भागातही दणकावून मतदानशहरातील ९९५ पैकी सुमारे ६९५ मतदान केंद्र हिंदू आणि दलित व इतर मतदारांचे प्राबल्य असलेले आहेत. त्यातील हिंदूबहुल प्राबल्य असलेल्या ८० टक्के बूथवर दणकावून मतदान झाले आहे. या वाढलेल्या मतदानावर महायुती आणि महाविकास आघाडीसह एमआयएमदेखील दावा करीत आहे.

ग्रामीण भागात किती बूथ ८० टक्क्यांच्या पुढे?ग्रामीण भागात १०२५ मतदान केंद्र आहेत. त्यातील ४०० बूथवर ८० टक्क्यांपेक्षा जास्तीचे मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यात गंगापूर, वैजापूर, कन्नडमधील मतदान केंद्रांचा समावेश आहे. यात गंगापूर ६०, वैजापूर ५० तर कन्नडमध्ये ६० बूथवर मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.

कुणाचे गणित काय?ग्रामीण भागात झालेल्या मतदानाच्या तुलनेत शहरातील तिन्ही मतदारसंघात ८ हजार ७९४ मतदान जास्त झाले. एमआयएमची भिस्त शहरातील मतदान केंद्रांवर अधिक आहे. ग्रामीण भागात मुस्लिम मतदान आणि काही प्रमाणात दलित व हिंदू मतदानांमुळे विजय होण्याची अपेक्षा एमआयएमला आहे. महायुती २०४० मतदान केंद्रांपैकी सुमारे १७०० मतदान केंद्रांवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत आहे. तर ठाकरे गट २०४० बूथवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत विजयाचे गणित मांडत आहे.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४