शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पाहणीत युतीने कन्नडला डावलले; आमदार जाधव यांचा नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:01 IST

कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

औरंगाबाद : कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु शिवसेना आणि भाजपने कन्नडला डावलल्याचा आरोप आ. हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना केला आहे. इतर तालुक्यांतील आणेवारी ५३ पैशांंच्या आसपास आहे. कन्नडची आणेवारी ५० पैशांखाली आलेली आहे. असे असताना त्या तालुक्याला मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे, असे जाहीर करण्यामागे राजकारणच आहे, असेही ते म्हणाले. 

दोन दिवसांपूर्वी शासनाने मराठवाड्यातील २७ जिल्ह्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. त्यामध्ये १४ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर दुष्काळाच्या छायेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये कन्नड तालुक्याचा समावेश मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली. त्यांच्या लक्षात स्थानिक परिस्थिती आलेली असताना त्यांनी असे का करावे, असा प्रश्न आहे. मी लोकसभा लढणार असल्याची भीती तर या दोन्ही पक्षांनी घेतली असावी, त्यामुळेच त्यांनी कन्नडमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ नसल्याचे जाहीर केले. दुष्काळाची पाहणी तीन टप्प्यांत होते. तिसऱ्या टप्प्यापर्यंत जर कन्नडमध्ये दुष्काळ जाहीर केला नाहीतर सरकारच्या तोंडाला फेस येईपर्यंत आंदोलन उभारण्याचा इशारा आ.जाधव यांनी दिला. 

शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू४६ पैसे आणेवारी आलेली आहे. ही आणेवारी दुष्काळ पाहणीतूनच समोर आलेली आहे. असे असताना मध्यम स्वरुपाचा दुष्काळ कसा काय होऊ शकतो. शिवसेना आणि भाजपनेच यामागे राजकारण केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत शासनाने कन्नडमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली नाहीतर शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा आ. जाधव यांनी दिला. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव