शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

दुष्काळ पाहणीत युतीने कन्नडला डावलले; आमदार जाधव यांचा नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 18:01 IST

कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

औरंगाबाद : कन्नड तालुक्याला दुसऱ्या स्तरावरील दुष्काळ पाहणीत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. परंतु शिवसेना आणि भाजपने कन्नडला डावलल्याचा आरोप आ. हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना केला आहे. इतर तालुक्यांतील आणेवारी ५३ पैशांंच्या आसपास आहे. कन्नडची आणेवारी ५० पैशांखाली आलेली आहे. असे असताना त्या तालुक्याला मध्यम स्वरुपाचा दुष्काळ आहे, असे जाहीर करण्यामागे राजकारणच आहे, असेही ते म्हणाले. 

दोन दिवसांपूर्वी शासनाने मराठवाड्यातील २७ जिल्ह्यांत गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे जाहीर केले. त्यामध्ये १४ तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे सांगण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ तालुके गंभीर दुष्काळाच्या छायेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये कन्नड तालुक्याचा समावेश मध्यम स्वरुपाच्या दुष्काळात करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

मंत्र्यांनी जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी केली. त्यांच्या लक्षात स्थानिक परिस्थिती आलेली असताना त्यांनी असे का करावे, असा प्रश्न आहे. मी लोकसभा लढणार असल्याची भीती तर या दोन्ही पक्षांनी घेतली असावी, त्यामुळेच त्यांनी कन्नडमध्ये गंभीर स्वरुपाचा दुष्काळ नसल्याचे जाहीर केले. दुष्काळाची पाहणी तीन टप्प्यांत होते. तिसऱ्या टप्प्यापर्यंत जर कन्नडमध्ये दुष्काळ जाहीर केला नाहीतर सरकारच्या तोंडाला फेस येईपर्यंत आंदोलन उभारण्याचा इशारा आ.जाधव यांनी दिला. 

शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासू४६ पैसे आणेवारी आलेली आहे. ही आणेवारी दुष्काळ पाहणीतूनच समोर आलेली आहे. असे असताना मध्यम स्वरुपाचा दुष्काळ कसा काय होऊ शकतो. शिवसेना आणि भाजपनेच यामागे राजकारण केले आहे. १५ डिसेंबरपर्यंत शासनाने कन्नडमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर केली नाहीतर शिवसेना मंत्र्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा आ. जाधव यांनी दिला. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdroughtदुष्काळHarshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधव