शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
2
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
6
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
7
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
8
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
9
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
10
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
11
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
12
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
13
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
14
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
15
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
16
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
17
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
18
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
19
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
20
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?

कलारंगच्या ‘काव्यधारा’: तू पत्र जाळल्यावर मी राख झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 19:33 IST

प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्‍या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्‍या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला.

औरंगाबाद : प्रेमाचा कायम ‘अनुशेष’ राहिलेल्या तरुणांच्या दु:खापासून ते पोराबाळांसाठी मरमर करणार्‍या आई-बापाच्या उतारवयातील यातना मांडणार्‍या कवितांचा शहरवासीयांनी अस्सल साहित्यानंद लुटला. निमित्त होते कलारंग सांस्कृतिक मंचतर्फे आयोजित ‘काव्यधारा’ या राज्यस्तरीय काव्यसंमेलनाचे.

तापडिया नाट्यमंदिरात मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि.२६) पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यभरातील नऊ निमंत्रित कवींनी सहभाग नोंदविला.  खालापूरच्या विशाल उशिरेने ‘बाप’ नावाच्या कवितेतून घामात अश्रू लपविणार्‍या बापाची कहाणी मांडत सुरवात केली.   बापावर लिहायचे राहून गेल्याची सल व्यक्त करताना तो म्हणतो, ‘आमचे मळे फुलवले, पण तुझे शिवार करपले.’ पोराबाळांसाठी कायमच तोट्यात जाणारा बाप मोठा व्यापारी, या शब्दांनी रसिकांची भरभरून दाद मिळवली. बेळगावच्या पूजा भडांगे हिने ‘पानाच्या अंगावरती शहारलेला काटा गं’ कविता सादर केली.

रायगडचा युवा गझलकार बंडू अंधेरेने प्रिया प्रकाश वॉरियरचा संदर्भ देत सुरुवात केली, ‘तिच्या रोखून नजरेला नजर, मी चाललो होतो, तिने मारला डोळा, मी लाजलो होतो.’ यावर तरुण रसिकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहाचा ‘माहोल’च ढवळला . प्रेमवीरांना ‘ठेवू नको इतका विश्वास पापण्यावर’ असा सल्ला देताना तो म्हणाला, ‘तू पत्र जाळल्यावर मी राख झालो.’  प्रेमात ‘कमनशिबी’ ठरलेल्यांचे दु:ख शब्दांत कैद करीत कोल्हापूरचा उमेश सुतार म्हणाला की, ‘तुझ्या आठवणी छळत नाही मला, तुझ्या आठवणींना मीच छळतो.’ ‘तोवर प्रेम करीन’ या कवितेत तो म्हणतो, ‘माझ्या प्रेमाची बँक सतत बुडीत आहे, सव्याज परतफेड करेपर्यंत प्रेम करीन मी, काळजाचे ठोके नाराज होईपर्यंत प्रेम करीन मी.’

तसेच मुंबईची यामिनी दळवी, यवतमाळची स्नेहा ढोल, अंबाजोगाईचा अविनाश भारती, हिंगोलीचा ध. सू. जाधव आणि स्थानिक कवी नीलेश चव्हाण यांनीही कविता सादर केल्या. निवेदक नीलेश चव्हाणने नीरव मोदीपासून ‘पकोड्या’पर्यंत कोपरखळ्या मारत सर्वांना खळखळून हसविले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद