शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

कड्याचे ३३ के.व्ही. उपकेंद्रच अंधारात !

By admin | Updated: September 23, 2014 23:42 IST

कडा: आष्टी तालुक्यातील बारा गावांना विद्युत पुरवठा करणारे कड्याचे ३३ के.व्ही. विद्युत केंद्रच अंधारात असल्याचे दिसून येत आहे.

कडा: आष्टी तालुक्यातील बारा गावांना विद्युत पुरवठा करणारे कड्याचे ३३ के.व्ही. विद्युत केंद्रच अंधारात असल्याचे दिसून येत आहे. या कार्यालयाची मोठी दुरवस्था झाली असून सुविधांचा अभाव आहे. याकडे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांमधून केला जात आहे.कडा ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत १२ गावांचा समावेश होतो. यामध्ये टाकळी अमिया, रूई, खराटे वडगाव, आनंदवाडी, केरूळ, कडा, खाकाळवाडी, शेलारवाडी, मोरेवाडी, शेरी खुर्द, शेरी बु. आदी गावांचा समावेश आहे. या गावांना सुरळीत विद्युत पुरवठा व्हावा यासाठी महावितरण कार्यालयाने ३३ के.व्ही. उपकेंद्र उभे केले. या उपकेंद्रात बारा कर्मचारी, चार आॅपरेटर नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणच्या कार्यालयाची दयनीय अवस्था निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कार्यालयात बसताना येथील कर्मचारी जीव मुठीत धरून बसत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कार्यालयाला गळती लागते. त्यामुळे बसण्यासाठीची जागा राहत नाही. दरवाजे, खिडक्या कार्यालयाला नसल्याने विविध अडचणींचा सामना या कर्मचाऱ्यांना करावा लागतो.कार्यालयाच्या चोहूबाजूंनी अडचण असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात गवत, बाभळींचा विळखाही पडल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सुविधांचा अभावया ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोयी- सुविधा पुरविल्या जात नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची सोयही नाही. तसेच शौचालय उपलब्ध नसल्याने उघड्यावर शौचास बसण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. यामध्ये महिलांची कुचंबना होत आहे. या उपकेंद्रांतर्गत बारा गावांना वीजपुरवठा करून गाव उजेडात ठेवण्याचे काम केले जाते. मात्र येथील कर्मचाऱ्यांनाच सोयी सुविधा मिळत नसल्याने व उपकेंद्रातच वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने हे कार्यालयच अंधारात असल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. वरिष्ठांच्या या दुर्लक्षामुळे येथील कर्मचाऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्यामधून संताप व्यक्त होत आहे. येथील कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरवून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. याबाबत आष्टी महावितरणचे अधिकारी राहूल जायभाये म्हणाले, या ठिकाणचा प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)