शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:34 IST

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून वाळूज महानगर परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांशी जलाशयांत पुरेसा साठा झाला नाही. त्यातच या भागात स्थानिक ग्रामपंचायतकीडून पाणी आडवा, पाणी जिरवा, तसेच तलाव खोलीकरणाचे कोणतेच काम झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधीही यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी, साजापूर, तीसगाव, घाणेगाव, गोलवाडीसह पाझर तलाव या गावासह लगतच्या गावचे जलस्त्रोत आहेत. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हे तलावही कोरडेठाक पडले आहेत.

तसेच टेंभापूर प्रकल्पही कोरडा पडला आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने तलावाला वाळवंटाचे स्वरुप आले आहे. त्याचबरोबर बहुतांशी जलस्त्रोतही आटले आहेत. परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून महानगरातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसभर टँकरची वाट बहुनही केवळ ५-६ हंडे पाणी मिळत असल्याने नागरिकांना सर्वस्वी विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई