शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:34 IST

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून वाळूज महानगर परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांशी जलाशयांत पुरेसा साठा झाला नाही. त्यातच या भागात स्थानिक ग्रामपंचायतकीडून पाणी आडवा, पाणी जिरवा, तसेच तलाव खोलीकरणाचे कोणतेच काम झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधीही यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी, साजापूर, तीसगाव, घाणेगाव, गोलवाडीसह पाझर तलाव या गावासह लगतच्या गावचे जलस्त्रोत आहेत. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हे तलावही कोरडेठाक पडले आहेत.

तसेच टेंभापूर प्रकल्पही कोरडा पडला आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने तलावाला वाळवंटाचे स्वरुप आले आहे. त्याचबरोबर बहुतांशी जलस्त्रोतही आटले आहेत. परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून महानगरातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसभर टँकरची वाट बहुनही केवळ ५-६ हंडे पाणी मिळत असल्याने नागरिकांना सर्वस्वी विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई