शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:34 IST

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून वाळूज महानगर परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांशी जलाशयांत पुरेसा साठा झाला नाही. त्यातच या भागात स्थानिक ग्रामपंचायतकीडून पाणी आडवा, पाणी जिरवा, तसेच तलाव खोलीकरणाचे कोणतेच काम झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधीही यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी, साजापूर, तीसगाव, घाणेगाव, गोलवाडीसह पाझर तलाव या गावासह लगतच्या गावचे जलस्त्रोत आहेत. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हे तलावही कोरडेठाक पडले आहेत.

तसेच टेंभापूर प्रकल्पही कोरडा पडला आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने तलावाला वाळवंटाचे स्वरुप आले आहे. त्याचबरोबर बहुतांशी जलस्त्रोतही आटले आहेत. परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून महानगरातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसभर टँकरची वाट बहुनही केवळ ५-६ हंडे पाणी मिळत असल्याने नागरिकांना सर्वस्वी विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

टॅग्स :Walujवाळूजwater scarcityपाणी टंचाई