शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

न्या. नाईक समितीच्या अहवालावर दोन दिवसांत निर्णय घेण्याची राज्य शासनाची उच्च न्यायालयात हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:46 IST

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन मंडळासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. वासंती नाईक समितीच्या अहवालावर राज्यशासन दोन दिवसांत निर्णय घेईल, अशी हमी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी औरंगाबाद खंडपीठाला दिली. यासंदर्भात न्या. एस.एस. शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांच्यासमोर सोमवारी (दि. ४) सुनावणी झाली.

औरंगाबाद : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन मंडळासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्या. वासंती नाईक समितीच्या अहवालावर राज्यशासन दोन दिवसांत निर्णय घेईल, अशी हमी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी औरंगाबाद खंडपीठाला दिली. यासंदर्भात न्या. एस.एस. शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांच्यासमोर सोमवारी (दि. ४) सुनावणी झाली.कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांनी खंडपीठात निळवंडे धरणासाठी शिर्डी संस्थानने देऊ केलेल्या ५०० कोटी निधीसंंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीला आली. एनजीओंना रुग्णवाहिका देण्यासंबंधीचा मुद्दाही याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विश्वस्तांच्या नियुक्तीचा विचार करण्यासाठी समिती नेमण्याचे आदेश राज्य शासनाला यापूर्वीच दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक यांची समिती स्थापन केली होती. समितीने महिनाभरापूर्वीच यासंबंधी राज्य शासनाला अहवाल सादर केलेला आहे. अहवाल सादर झालेला असताना राज्य शासनाने त्यावर निर्णय घेतला नसल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केल्यानंतर यासंंबंधी खंडपीठाने विचारणा केली. राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी वरीलप्रमाणे हमी दिली. संस्थानच्या वतीने अ‍ॅड. नितीन भवर पाटील, याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयshirdiशिर्डी