शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी

By विकास राऊत | Updated: July 4, 2024 16:24 IST

दप्तर दिरंगाई आता चालणार नाही; एक महिन्यांत सगळी प्रकरणे निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय, तहसीलदार व अन्य अनुषंगिक कार्यालयांमध्ये विविध अर्ज, निवेदने, तक्रारी दप्तर दिरंगाईमुळे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ३० जुलैपर्यंत सगळ्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश मंगळवारी एका प्रशिक्षणादरम्यान दिले.

शून्य प्रलंबितता अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षणाने या अभियानाची सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, ३० जुलै ही अंतिम तारीख ठरवून त्या तारखेपर्यंतची सर्व पत्र, निवेदने, तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

महिन्याभरात असे करावे लागेल काम३ ते ७ जुलै उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय स्तरावर प्रशिक्षण, ७ ते १७ जुलै प्रत्यक्ष कामकाज, स्वच्छता, छाननी, वर्गवारी, प्रलंबितता शोधमोहीम राबविणे, तक्रार निवारण दिवस २० ते २२ जुलै दरम्यान घेणे, २३ ते २८ जुलै प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन निकाली काढणे, २८ ते २९ जुलै सर्व प्रपत्रात माहिती पाठविणे, ३० जुलै शून्य प्रलंबितता घोषित करणे.

जरा धूळ झटका गठ्ठ्यांवरीलदप्तराच्या अद्ययावतीकरणासह सहा गठ्ठा पद्धतीने अभिलेखे लावण्याचे आदेश स्वामी यांनी दिले. दप्तराच्या नोंद वह्या, अभिलेख कक्ष अद्ययावत करावे लागेल. संपूर्ण कार्यालयाची साफसफाई, नस्ती, कागदपत्रे तपासून त्यांचे वर्गीकरण, गठ्ठे, सूची बनवणे, कार्यालय व्यवस्थापन, कार्यालये पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न, अभ्यागतांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही कामे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग