शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:02 IST

बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ...

बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती देण्यासाठी विमा कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधला; मात्र तो होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नुकसानीचा विमा टाळण्यासाठी कंपन्या जाणूनबुजून संपर्काबाहेर असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्याचीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

अतिवृष्टीमुळे बाजारसावंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत टोलफ्री क्रमांकावर कळविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची माहिती देण्यासाठी दोन दिवसांपासून शेतकरी विमा कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक डायल करीत आहेत. तसेच इतर मार्गांनीही संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहेत; मात्र तो होत नसल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच नुकसानाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर पायपीट करीत तालुका कार्यालयावर जाण्याची वेळ आलेली आहे; मात्र तेथे गेल्यानंतरही भरपाई मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी याचा नाद सोडून दिला आहे. यामुळे विमा कंपन्यांचे चांगलेच फावत आहे.

तीन दिवस सुट्या

अतिवृष्टीनंतर शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्याने या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झालेली आहे. एकीकडे झालेले नुकसान तर दुसरीकडे विमा मिळेल, याची खात्री नाही. तर तिसरीकडे तक्रार व पंचनामेही होईना, यामुळे विमा काढूनही उपयोग होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

चौकट

विमा कंपन्या पळवाटा काढत आहेत

आम्ही वेळेत विमा कंपनीकडे विमा हफ्ता भरुन पिकासाठी संरक्षण मिळविले; मात्र विमा कंपन्यांनी पळवाटा व विविध अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. यामुळे बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या नफ्यात राहण्यासाठी हा खटाटोप करीत असल्याचा आरोप बाजारसावंगी येथील विमाधारक शेतकरी जानकीराम नलावडे व सुधाकर औटे यांनी केला आहे.