शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:02 IST

बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ...

बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती देण्यासाठी विमा कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधला; मात्र तो होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नुकसानीचा विमा टाळण्यासाठी कंपन्या जाणूनबुजून संपर्काबाहेर असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्याचीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

अतिवृष्टीमुळे बाजारसावंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत टोलफ्री क्रमांकावर कळविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची माहिती देण्यासाठी दोन दिवसांपासून शेतकरी विमा कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक डायल करीत आहेत. तसेच इतर मार्गांनीही संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहेत; मात्र तो होत नसल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच नुकसानाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर पायपीट करीत तालुका कार्यालयावर जाण्याची वेळ आलेली आहे; मात्र तेथे गेल्यानंतरही भरपाई मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी याचा नाद सोडून दिला आहे. यामुळे विमा कंपन्यांचे चांगलेच फावत आहे.

तीन दिवस सुट्या

अतिवृष्टीनंतर शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्याने या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झालेली आहे. एकीकडे झालेले नुकसान तर दुसरीकडे विमा मिळेल, याची खात्री नाही. तर तिसरीकडे तक्रार व पंचनामेही होईना, यामुळे विमा काढूनही उपयोग होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

चौकट

विमा कंपन्या पळवाटा काढत आहेत

आम्ही वेळेत विमा कंपनीकडे विमा हफ्ता भरुन पिकासाठी संरक्षण मिळविले; मात्र विमा कंपन्यांनी पळवाटा व विविध अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. यामुळे बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या नफ्यात राहण्यासाठी हा खटाटोप करीत असल्याचा आरोप बाजारसावंगी येथील विमाधारक शेतकरी जानकीराम नलावडे व सुधाकर औटे यांनी केला आहे.