शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:02 IST

बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ...

बाजारसावंगी : परिसरात ६ व ७ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती देण्यासाठी विमा कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधला; मात्र तो होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. नुकसानीचा विमा टाळण्यासाठी कंपन्या जाणूनबुजून संपर्काबाहेर असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्याचीही शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

अतिवृष्टीमुळे बाजारसावंगी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर आदी पिकांचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला आहे, त्यांना कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत टोलफ्री क्रमांकावर कळविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानाची माहिती देण्यासाठी दोन दिवसांपासून शेतकरी विमा कंपन्यांचा टोल फ्री क्रमांक डायल करीत आहेत. तसेच इतर मार्गांनीही संपर्क साधायचा प्रयत्न करीत आहेत; मात्र तो होत नसल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अगोदरच नुकसानाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर पायपीट करीत तालुका कार्यालयावर जाण्याची वेळ आलेली आहे; मात्र तेथे गेल्यानंतरही भरपाई मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी याचा नाद सोडून दिला आहे. यामुळे विमा कंपन्यांचे चांगलेच फावत आहे.

तीन दिवस सुट्या

अतिवृष्टीनंतर शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्या असल्याने या शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ झालेली आहे. एकीकडे झालेले नुकसान तर दुसरीकडे विमा मिळेल, याची खात्री नाही. तर तिसरीकडे तक्रार व पंचनामेही होईना, यामुळे विमा काढूनही उपयोग होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

चौकट

विमा कंपन्या पळवाटा काढत आहेत

आम्ही वेळेत विमा कंपनीकडे विमा हफ्ता भरुन पिकासाठी संरक्षण मिळविले; मात्र विमा कंपन्यांनी पळवाटा व विविध अडथळे निर्माण करून शेतकऱ्यांची थट्टा करीत आहे. यामुळे बहुतांश शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विमा कंपन्या नफ्यात राहण्यासाठी हा खटाटोप करीत असल्याचा आरोप बाजारसावंगी येथील विमाधारक शेतकरी जानकीराम नलावडे व सुधाकर औटे यांनी केला आहे.